शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरने घडविले मृत्यूचे पर्यटन

By admin | Updated: September 11, 2014 09:22 IST

१५ दिवसांपूर्वीच डोंबिवलीहून श्रीनगरला गेलो. ३० आॅगस्टपासून सोसाट्याचा वारा अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. श्रीनगरसह परिसराचा उर्वरित भारताशी संपर्क तुटला होता.

अनिकेत घमंडी, डोंबिवली१५ दिवसांपूर्वीच डोंबिवलीहून श्रीनगरला गेलो. ३० आॅगस्टपासून सोसाट्याचा वारा अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. श्रीनगरसह परिसराचा उर्वरित भारताशी संपर्क तुटला होता. वीजच नसल्याने तेथे मोबाइल-लॅपटॉप सर्व काही हाताशी असूनही फायदा झाला नाही. परमेश्वराचा धावा करणे एवढेच हातात होते. केंद्र सरकारने कोट्यवधींची मदत जाहीर केल्याचे डोंबिवलीत परतल्यावर समजले. प्रत्यक्षात ती मदत अद्यापही लहान गावांना पोहोचलेली नाही... किशोर गडा यांना आलेला हा विदारक अनुभव त्यांनी ‘लोकमत’ला सांगितला.टूर्सचा व्यवसाय करणारे गडा पर्यटकांना तिथे सोडून श्रीनगरला गेले होते. त्यांना तेथे आपुले मरण पाहिले म्यां डोळा, अशीच अनुभूती आली. ‘नजर जाईल तिथे पाणी. एरव्ही छोटी परंतु आकर्षक वाटणारी रंगीबेरंगी, टूमदार घरे पाण्याखाली होती. त्यामुळे गच्चीवर जेथे नजर जावी तिथे माणसं दिसत होती, अशा शब्दांत त्यांनी त्या दृश्याचे वर्णन केले.हॉटेल सुलतानमध्ये गडा गेले १५ दिवस वास्तव्यास होते. मध्यंतरी पावसाचा वेग कमी झाल्यावर ते कसेबसे ‘दाललेक’ परिसरात जाऊन आले. मात्र तेथेही भयानक अवस्था होती. पायाखालची जमीनच नाहीशी झाल्यासाखे वाटत होते. पाण्याच्या प्रवाहात मेलेले प्राणी, जिथे कानोसा घ्यावा तेथे सेव्ह मी, बचाओ यासह अन्य विविध भाषांमधील ‘वाचवा वाचवा’चे टाहो ऐकू येत होते. ‘पटनी टॉप’च्या परिसराचीही हीच स्थिती होती. वैष्णोदेवीच्या मार्गावरच्या ‘त्रिकुटा’च्या पहाडाची पडझड झाली होती. ‘कुंद पहाडा’चीही अशीच काहीशी स्थिती होती. महिला आणि बालकांच्या रडण्याच्या आवाजाने कोणाकोणाला आणि कसे वाचवले जाणार, हे समजेनासे झाले होते, अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता मांडली.दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला आणि पर्यटकांनी अक्षरश: पळ काढला. उधमपूर रेल्वे स्थानकातून ‘विवेक’ रेल्वे पकडून बॉम्बे सेंट्रल स्थानक गाठले आणि डोंबिवलीत घरी पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने जिवात जीव आला... गडा यांचा हा अनुभव ऐकून कुटुंबीय हादरून गेले. तिथल्या चहाच्या (सुखदेव) नाक्यावरदेखील प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. वर्दळीच्या ठिकाणीही प्रत्येकाच्या मनात स्मशानशांतता पसरली होती, असे अनंत मंगळवेढेकर आणि संदीप जोशी यांनी सांगितले.