शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

काश्मीरने घडविले मृत्यूचे पर्यटन

By admin | Updated: September 11, 2014 09:22 IST

१५ दिवसांपूर्वीच डोंबिवलीहून श्रीनगरला गेलो. ३० आॅगस्टपासून सोसाट्याचा वारा अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. श्रीनगरसह परिसराचा उर्वरित भारताशी संपर्क तुटला होता.

अनिकेत घमंडी, डोंबिवली१५ दिवसांपूर्वीच डोंबिवलीहून श्रीनगरला गेलो. ३० आॅगस्टपासून सोसाट्याचा वारा अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. श्रीनगरसह परिसराचा उर्वरित भारताशी संपर्क तुटला होता. वीजच नसल्याने तेथे मोबाइल-लॅपटॉप सर्व काही हाताशी असूनही फायदा झाला नाही. परमेश्वराचा धावा करणे एवढेच हातात होते. केंद्र सरकारने कोट्यवधींची मदत जाहीर केल्याचे डोंबिवलीत परतल्यावर समजले. प्रत्यक्षात ती मदत अद्यापही लहान गावांना पोहोचलेली नाही... किशोर गडा यांना आलेला हा विदारक अनुभव त्यांनी ‘लोकमत’ला सांगितला.टूर्सचा व्यवसाय करणारे गडा पर्यटकांना तिथे सोडून श्रीनगरला गेले होते. त्यांना तेथे आपुले मरण पाहिले म्यां डोळा, अशीच अनुभूती आली. ‘नजर जाईल तिथे पाणी. एरव्ही छोटी परंतु आकर्षक वाटणारी रंगीबेरंगी, टूमदार घरे पाण्याखाली होती. त्यामुळे गच्चीवर जेथे नजर जावी तिथे माणसं दिसत होती, अशा शब्दांत त्यांनी त्या दृश्याचे वर्णन केले.हॉटेल सुलतानमध्ये गडा गेले १५ दिवस वास्तव्यास होते. मध्यंतरी पावसाचा वेग कमी झाल्यावर ते कसेबसे ‘दाललेक’ परिसरात जाऊन आले. मात्र तेथेही भयानक अवस्था होती. पायाखालची जमीनच नाहीशी झाल्यासाखे वाटत होते. पाण्याच्या प्रवाहात मेलेले प्राणी, जिथे कानोसा घ्यावा तेथे सेव्ह मी, बचाओ यासह अन्य विविध भाषांमधील ‘वाचवा वाचवा’चे टाहो ऐकू येत होते. ‘पटनी टॉप’च्या परिसराचीही हीच स्थिती होती. वैष्णोदेवीच्या मार्गावरच्या ‘त्रिकुटा’च्या पहाडाची पडझड झाली होती. ‘कुंद पहाडा’चीही अशीच काहीशी स्थिती होती. महिला आणि बालकांच्या रडण्याच्या आवाजाने कोणाकोणाला आणि कसे वाचवले जाणार, हे समजेनासे झाले होते, अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता मांडली.दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला आणि पर्यटकांनी अक्षरश: पळ काढला. उधमपूर रेल्वे स्थानकातून ‘विवेक’ रेल्वे पकडून बॉम्बे सेंट्रल स्थानक गाठले आणि डोंबिवलीत घरी पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने जिवात जीव आला... गडा यांचा हा अनुभव ऐकून कुटुंबीय हादरून गेले. तिथल्या चहाच्या (सुखदेव) नाक्यावरदेखील प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. वर्दळीच्या ठिकाणीही प्रत्येकाच्या मनात स्मशानशांतता पसरली होती, असे अनंत मंगळवेढेकर आणि संदीप जोशी यांनी सांगितले.