शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मृत जलस्रोतांना नवसंजीवनी!

By admin | Updated: May 24, 2015 01:39 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या.

राजेश भोजेकर ल्ल वर्धापाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या. यातील मृत जलस्रोत जिवंत करून भूगर्भातील जलसाठा वाढविण्यावर भर देणारी योजना उपयुक्त ठरली आहे. तामसवाडा येथील शेतकऱ्यांनी ही योजना राबवून परिसर जलयुक्त केला. ‘उगम ते संगम’ या तत्त्वावर शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या केलेला हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला मार्गदर्शक ठरला आहे.पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. यामुळे लाखो लिटर पाणी नदी व नाल्याद्वारे वाहून जाते. परिणामी, पावसाळा संपला की शेतपिकांसाठी तर दूरच पिण्याकरिताही पाणी मिळत नाही. हे ध्यानी घेऊन तामसवाडा येथे नाल्याचा उगम ते नदीला मिळेपर्यंतच्या पात्राचे सर्वेक्षण करण्यात आले. या नाल्याच्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न तेथील शेतकऱ्यांनी केला. या प्रयोगाला १०० टक्के यशही मिळाले.तामसवाडा नाला गाळविरहित करण्यात आला. शिवाय रुंदीकरण, विविध प्रकारचे माती बांध, दगडी, गॅबियन, सिमेंट बांध आदी कामे जलसंधारणासाठी मिळणारा विशेष निधी व स्थानिक विकास योजनेतून करण्यात आली. यामुळे आठ किमी लांबीच्या या नाल्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातही सुमारे अडीच लाख क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध आहे. शिवाय या प्रकल्पामुळे परिसरातील सहा गावांतील विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील आदिवासीबहुल तामसवाडा शिवारातून वाहणाऱ्या या नाल्याला पावसाळ्यात पूर यायचा. त्यामुळे हजारो एकर शेती खरडून जात होती. पावसाळा संपल्यावर मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असे. मग काय, जनावरांसह येथील कुटुंबांना स्थलांतर करावे लागत होते. यंदा मात्र या शेतकरी, ग्रामस्थांवर ही वेळ येणार नाही. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने ही समस्या कायम निकाली निघाली आहे. पावसाचे पाणी एकमेव स्रोत असल्यामुळे जलसंधारणाच्या या प्रयोगमध्ये मृत नाल्याचे पुनरुज्जीवन केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मे महिन्याच्या मध्यातही पाणीसाठा असल्यामुळे शेतकरी तिसरे उन्हाळी पीक घेत आहेत. - माधव कोटस्थाने, प्रकल्प अभियंता तथा सदस्य,केंद्रीय बांधकाम पाणलोट व्यवस्थापन संचालन समिती, वर्धा.च्उगम ते संगम या तत्त्वानुसार तामसवाडा येथील नाल्याचे ३५० मीटर लांबीपर्यंतचे २५ भाग करून प्रत्येक भागात पावसाचे पाणी अडवून साठविण्यात आले. शिरपूर पॅटर्ननुसार बांधलल्या या प्रकल्पामध्ये पाणी संथगतीने वाहणे, प्रत्येक भागात साठवणे सहजशक्य झाले आहे. यामुळे संगामाकडील भागात जलसाठा होतो व पुनर्भरण होते. च्या उपक्रमामुळे मागील दोन पावसाळ्यांत ७० हजार क्युसेक मीटर पाणीसाठा झाला असून सुमारे पाच लक्ष क्युसेक मीटर पाणी भूगर्भात मुरले. त्यामुळेच सहा गावातील ४५ ते ५० विहिरीतील जलसाठ्यात सुमारे पाच मीटरपर्यंत वाढ झाली आहे. २४ तास पाणीपिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या सहा गावांना आता नाला पुनर्भरण प्रकल्पामुळे २४ तास पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला ४५ फूट पाणी उलपब्ध आहे.