शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

मृत जलस्रोतांना नवसंजीवनी!

By admin | Updated: May 24, 2015 01:39 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या.

राजेश भोजेकर ल्ल वर्धापाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या. यातील मृत जलस्रोत जिवंत करून भूगर्भातील जलसाठा वाढविण्यावर भर देणारी योजना उपयुक्त ठरली आहे. तामसवाडा येथील शेतकऱ्यांनी ही योजना राबवून परिसर जलयुक्त केला. ‘उगम ते संगम’ या तत्त्वावर शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या केलेला हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला मार्गदर्शक ठरला आहे.पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. यामुळे लाखो लिटर पाणी नदी व नाल्याद्वारे वाहून जाते. परिणामी, पावसाळा संपला की शेतपिकांसाठी तर दूरच पिण्याकरिताही पाणी मिळत नाही. हे ध्यानी घेऊन तामसवाडा येथे नाल्याचा उगम ते नदीला मिळेपर्यंतच्या पात्राचे सर्वेक्षण करण्यात आले. या नाल्याच्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न तेथील शेतकऱ्यांनी केला. या प्रयोगाला १०० टक्के यशही मिळाले.तामसवाडा नाला गाळविरहित करण्यात आला. शिवाय रुंदीकरण, विविध प्रकारचे माती बांध, दगडी, गॅबियन, सिमेंट बांध आदी कामे जलसंधारणासाठी मिळणारा विशेष निधी व स्थानिक विकास योजनेतून करण्यात आली. यामुळे आठ किमी लांबीच्या या नाल्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातही सुमारे अडीच लाख क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध आहे. शिवाय या प्रकल्पामुळे परिसरातील सहा गावांतील विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील आदिवासीबहुल तामसवाडा शिवारातून वाहणाऱ्या या नाल्याला पावसाळ्यात पूर यायचा. त्यामुळे हजारो एकर शेती खरडून जात होती. पावसाळा संपल्यावर मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असे. मग काय, जनावरांसह येथील कुटुंबांना स्थलांतर करावे लागत होते. यंदा मात्र या शेतकरी, ग्रामस्थांवर ही वेळ येणार नाही. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने ही समस्या कायम निकाली निघाली आहे. पावसाचे पाणी एकमेव स्रोत असल्यामुळे जलसंधारणाच्या या प्रयोगमध्ये मृत नाल्याचे पुनरुज्जीवन केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मे महिन्याच्या मध्यातही पाणीसाठा असल्यामुळे शेतकरी तिसरे उन्हाळी पीक घेत आहेत. - माधव कोटस्थाने, प्रकल्प अभियंता तथा सदस्य,केंद्रीय बांधकाम पाणलोट व्यवस्थापन संचालन समिती, वर्धा.च्उगम ते संगम या तत्त्वानुसार तामसवाडा येथील नाल्याचे ३५० मीटर लांबीपर्यंतचे २५ भाग करून प्रत्येक भागात पावसाचे पाणी अडवून साठविण्यात आले. शिरपूर पॅटर्ननुसार बांधलल्या या प्रकल्पामध्ये पाणी संथगतीने वाहणे, प्रत्येक भागात साठवणे सहजशक्य झाले आहे. यामुळे संगामाकडील भागात जलसाठा होतो व पुनर्भरण होते. च्या उपक्रमामुळे मागील दोन पावसाळ्यांत ७० हजार क्युसेक मीटर पाणीसाठा झाला असून सुमारे पाच लक्ष क्युसेक मीटर पाणी भूगर्भात मुरले. त्यामुळेच सहा गावातील ४५ ते ५० विहिरीतील जलसाठ्यात सुमारे पाच मीटरपर्यंत वाढ झाली आहे. २४ तास पाणीपिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या सहा गावांना आता नाला पुनर्भरण प्रकल्पामुळे २४ तास पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला ४५ फूट पाणी उलपब्ध आहे.