शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

दिवस वाहतूककोंडीचा

By admin | Updated: September 23, 2016 04:34 IST

मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज ये-जा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे

ठाणे : मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज येजा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे शहरात न भुतो न भविष्यती अशी वाहतूककोंडी गुरुवारी अनुभवायला मिळाली. वाहतूकव्यवस्थेतील या बदलाबरोबरच बंदी धाब्यावर बसवून अवजड वाहनांनी शहरात केलेल्या बिनदिक्कत प्रवेशामुळे दहिसर ते वांद्रे भागातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. तीन तासांहून अधिक काळ प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले होते. वरसोवा पूल नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतून येणारी ही वाहने ठाण्यातून जाऊ लागल्याने नाशिक रोडवरील ताण वाढला आहे. त्याचा फटका ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरांतील वाहतुकीला बसल्याने गुरुवारी सकाळपासून दिवसभर ठाणे जाम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. वाहतूककोंडीत सापडल्याने हैराण झालेल्या वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, कंटाळलेल्या प्रवाशांनी पायी काही अंतर चालणे तसेच काही मिनिटांच्या प्रवासाकरिता चक्क तीन-तीन तास लागत असल्याने महिला व लहान मुले यांचे अतोनात हाल झाल्याचे चित्र या ठिकाणी भेट दिली असता दिसले.

एकीकडे वरसोवा पूल बंद केल्याने ठाण्यात कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे ठाणे आणि कल्याणमध्ये मागील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्याने गणपती विसर्जनाकरिता तात्पुरते टाकलेले डांबर उखडले जाऊन रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मुंब्रा बायपास येथून होणारी वाहतूक सुरळीत होत नसल्याने त्याचा फटका कल्याण-शीळफाटा आणि मुंब्रा बायपास तसेच भिवंडी-मानकोली या परिसरात प्रवास करणाऱ्यांना दिवसभर बसला. येथील वाहतूककोंडीमुळे कल्याण-शीळफाटा, मुंब्रा बायपास, भिवंडी-मानकोली या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांनाही दोन ते तीन तास लागत होते. मुंबई, ठाण्यात १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांच्या प्रवेशास बंदी आहे. त्यांच्या प्रवेशाच्या वेळा निश्चित केलेल्या असतानाही अनेक अवजड वाहने कुठल्याही वेळी रस्त्यावरून जात असल्याचे कसे दिसते, असा सवाल कोंडीत अडकलेल्यांनी केला. कळवा येथील महालक्ष्मी मंदिरापाशी एकाच वेळी पाच पाच वाहतूक पोलीस कोंडाळे करून उभे असल्याचे दिसले. मात्र, ज्या कापूरबावडीपाशी वाहतूककोंडी झाली होती, तेथे वाहतूक पोलीस अभावाने दिसल्याचे काही वाहनचालकांनी निदर्शनास आणले.