शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लग्नाचे दिवसी नगरदेवाचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: July 21, 2016 20:46 IST

गावाची बसफेरी बंद झाल्याने नागरिकांचे व लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांचे झालेले हाल पाहता संतापलेल्या नवरदेवाने गुरुवारी लग्नाच्या दिवसी दुपारी तिवसा तहसीलदारांच्या

तिवसा येथील घटना : गावात बसफेरीची मागणीतिवसा, अमरावती : गावाची बसफेरी बंद झाल्याने नागरिकांचे व लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांचे झालेले हाल पाहता संतापलेल्या नवरदेवाने गुरुवारी लग्नाच्या दिवसी दुपारी तिवसा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले व वणी (ममदापूर) गावात तत्काळ बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. आश्वासनानंतर नवरदेव पुन्हा मंगल कार्यालयात पोहोचला व वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडला.

तिवसा तालुक्यामधील वणी (ममदापूर) या ग्रामपंचायतीचे सदस्य मुकुंद पुनसे यांचे गुरूवारी तिवसा येथील एका मंगल कार्यालयात गुरुवारी लग्न होते. लग्नाचे सोपस्कार आटोपताच गावात बस देखील येत नाही म्हणून संतापलेल्या नवरदेवाने सहकाऱ्यासह दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार राम लंके यांच्या कक्षात ठिय्या दिला. नवरदेवापाठोपाठ वऱ्हाड्यांनी देखील तहसील कार्यालयात गर्दी केली.

वणी या गावातील रस्ते रेती घाटातून होणाऱ्या जड वाहतुकीने खराब झाले आहेत त्यामुळे गावात येणारी बसफेरी महामंडळाद्वारा बंद करण्यात आली. त्यामुळे वणीसह ममदापूर, काटसूर, इसापूर व नमस्कारी या गावातील नागरिक व तिवसा येथील शाळेत येणारे विद्यार्थी यांना पायदळ किंवा अ‍ॅटोने येण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही याचा संताप नवरदेव मुकुंद पुनसे यांना होता व त्यांनी चक्क लग्नाचे दिवसी गावाच्या रस्त्याची दुरूस्ती व बसफेरी सुरू करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार राम लंके यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वणी येथे बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले व वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडला. शासनाने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर ३१ जुलै रोजी रस्ता रोको करणार असल्याची माहिती पुनसे यांनी दिली.