शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्याही मुसक्या आवळू !

By admin | Updated: October 28, 2015 02:54 IST

देवेंद्र फडणवीस : छोटा राजन लवकरच भारताच्या ताब्यात

कवठेमहांकाळ : कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन छोटा राजन याला इंडोनेशियाच्या पोलिसांनी पकडले असून, लवकरच त्याला भारताच्या ताब्यात घेण्यात येईल, तसेच दाऊदच्याही मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जोरदार यंत्रणा राबविली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.मुख्यमंत्री फडणवीस सांगली जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानाला भेट दिली. तेथेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इंडोनिशिया व भारत यांच्यामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा करार झालेला नाही. परंतु उभय देशांमध्ये मैत्रीचे संबंध असल्याने केंद्र सरकारने छोटा राजनला भारताच्या ताब्यात घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच छोटा राजनला केंद्र सरकार ताब्यात घेईल. छोटा राजनवर सर्वप्रथम महाराष्ट्र पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. त्याबाबतचे पुरावे आम्ही देऊ. त्यामुळे त्याला केंद्र सरकारकडून महाराष्ट्र पोलीसच पहिल्यांदा ताब्यात घेतील व त्याने महाराष्ट्रात केलेल्या अनेक गुन्ह्यांची चौकशी केली जाईल.छोटा राजनबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीच्याही मुसक्या आवळल्या जाणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहे. तशी यंत्रणा लावली जात आहे. दाऊदलाही नजीकच्या काळात जेरबंद केले जाईल., असा विशवसही त्यांनी व्यक्त केला.यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, जयसिंगराव शेंडगे, हायूम सावनूरकर आदी उपस्थित होते. एफआरपी एका हप्त्यातच!एफआरपी कायदा राबविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारचे रोखठोक मत मांडले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी कायद्यानुसार एका हप्त्यातच सर्व रक्कम दिली पाहिजे, असे आपल्या सरकारने सर्व कारखान्यांना सांगितले आहे. राज्यातील काही कारखानदार टप्प्या-टप्प्याने एफआरपी देण्याची मुभा मिळावी, अशी सवलत मागत होते. परंतु शेतकऱ्यांवर कसलाही अन्याय होऊ नये, एफआरपी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे.