शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धोकादायक माळशेज घाट

By admin | Updated: August 1, 2016 01:47 IST

विशाखापट्टणम महामार्ग क्र.२२२ वरील नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात आजही अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे.

खोडद : विशाखापट्टणम महामार्ग क्र.२२२ वरील नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात आजही अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. या दरडी कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेशकुमार कल्याणकर यांनी गुरुवारी (दि. २८) माळशेज घाटात येऊन संपूर्ण घाटाची पाहणी केली.माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळणे हे आता नित्याचेच झाले आहे. मात्र, घाटात कोसळणाऱ्या या दरडींमुळे होणारे अपघात व जीवितहानी भयावह आहे. चालू वर्षी जुलै महिन्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे दर ८ दिवसांनी घाटात दरडी कोसळण्याच्या ३ घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या वतीने घाटातील कोसळलेल्या दरडी बाजूला काढण्याचे काम करण्यात आले.माळशेज घाटात सध्या किमी ९० (छत्री पॉइंट) पासून किमी ९४ पर्यंत (घाट संपतो तिथपर्यंत) ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. या दरम्यानच्या सर्व धोकादायक दरडी व मोकळे झालेले मोठे दगड मनुष्यबळाचा वापर करून काढण्याचे काम मागील ८ दिवसांपासून सुरू आहे. या कामासाठी सुमारे ४० मजूर लावण्यात आले आहेत. घाटात सतत असणारा पाऊस, वारा व धुके यामुळे हे काम करण्यास विलंब होत आहे. पाऊस उघडीप देईल त्यानुसार हे काम सुरू आहे. येत्या गुरुवारपासून (दि.४) घाटातून होणारी वाहतूक ठिकठिकाणी थांबवून, काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु ठेवून हे काम करण्यात येणार आहे. मात्र या कामासाठी घाटातील वाहतूक बंद केली जाणार नाही.’ असे राष्ट्रीय महामार्गाचे स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेशकुमार कल्याणकर व अन्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २८) माळशेज घाटात येऊन संपूर्ण घाटाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)>गेल्या वर्षी माळशेज घाटात ९१.५०० किमीजवळ गणेशमंदिराच्या वरच्या बाजूला डोंगरकड्यांवरून कोसळणारे दगड झेलून धरण्यासाठी डोंगरकड्याला सुमारे ६० मीटरपर्यंत जाळी लावण्यात आली आहे.