शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

दिघीत ४० वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी ठरतेय धोकादायक

By admin | Updated: January 16, 2017 01:50 IST

ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली

दिघी : ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकीशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, संबंधित प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहणार आहे का, असा सवाल केला आहे. १९७८ मध्ये दिघीतील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. या टाकीची एक लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता होती. अंदाजे तीस वर्षे अविरत सेवा करून शेवटी या टाकीची झीज होण्यास सुरुवात झाली. कालांतराने धोकादायक ठरू पाहणा-या टाकीतील पाणीपुरवठा साठवणे बंद करून टाकी मोकळी करण्यात आली. दरम्यान दिघी गावचा पालिकेत समावेश झाल्यानंतर टाकी पाडण्यासंदर्भात ठराव केला. मात्र प्रत्येक वेळी आयुक्त व प्रशासकीय अधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतरसुद्धा टाकी पाडण्याविषयी कुठलीही कारवाई झाली नाही. उलट वर्षानुवर्षे जाऊन ४० वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. ऊन व पावसाच्या तडाख्याने टाकीची अवस्था मोडकळीस आलेली आहे. मुख्य चार कॉलमची झीज होऊन भरमसाठ वजन पेलण्याची क्षमता नसून, आतील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. (वार्ताहर)>दिघी गावठाणातील पालिकेच्या शाळेजवळच ही धोकादायक टाकी उभी आहे. टाकीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, स्थानिक रहिवाशांची लहान मुले येथे खेळताना दिसतात. टाकीची अवस्था लक्षात घेता ती कधी कोसळून पडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टाकीच्या बाजूला असलेले विजेचे उघडे तार तुटून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कधी काळी जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी उद्या दिघीकरांचा काळ ठरणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधित प्रशासनाने पाण्याची टाकी पाडण्याची मागणी केली आहे.