शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

राज्यातील धरणे भरू लागली

By admin | Updated: August 1, 2016 04:35 IST

जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली

मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आल्याने पिकांचीही चांगली वाढ होणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही धरणसाठ्यात वाढ होत असून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रकल्पांत दोन दिवसांत जलसाठा वाढला आहे. मराठवाड्यात मात्र अजून धरण साठ्यात मोठी वाढ झालेली नाही. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत मराठवाड्यातील जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल. नागपूर विभागातील मोठे प्रकल्प ५७ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. तसेच मध्यम प्रकल्पात ६२ टक्क्यांपर्यंत तर लघु प्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा झाला आहे. अप्परवर्धा जलाशयाच्या पातळीत वाढ झाल्याने रविवारी सायंकाळी तीन दरवाजे उघडून ५० घनमीटर प्रती सेकंदनुसार पाणी सोडण्यात आले. उजनीत वाढसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे़ ते आता उणे २८ टक्क्यांवर आले आहे़ दौंडमधून ८६५ क्युसेक्सआणि बंडगार्डनमधून २,९१६ क्युसेक्स विसर्ग धरणात येत आहे़ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९१ टक्के भरले असले तरी २५.३९२ टीएमसीचे काळम्मावाडी (दूधगंगा) धरण अद्याप ५४ टक्केच भरले आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सध्या ५८.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>जायकवाडी मृतसाठ्यातच जायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. पाणीपातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. गेल्या महिनाभरात जायकवाडी धरणात २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.