शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणे भरू लागली

By admin | Updated: August 1, 2016 04:35 IST

जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली

मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आल्याने पिकांचीही चांगली वाढ होणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही धरणसाठ्यात वाढ होत असून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रकल्पांत दोन दिवसांत जलसाठा वाढला आहे. मराठवाड्यात मात्र अजून धरण साठ्यात मोठी वाढ झालेली नाही. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत मराठवाड्यातील जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल. नागपूर विभागातील मोठे प्रकल्प ५७ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. तसेच मध्यम प्रकल्पात ६२ टक्क्यांपर्यंत तर लघु प्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा झाला आहे. अप्परवर्धा जलाशयाच्या पातळीत वाढ झाल्याने रविवारी सायंकाळी तीन दरवाजे उघडून ५० घनमीटर प्रती सेकंदनुसार पाणी सोडण्यात आले. उजनीत वाढसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे़ ते आता उणे २८ टक्क्यांवर आले आहे़ दौंडमधून ८६५ क्युसेक्सआणि बंडगार्डनमधून २,९१६ क्युसेक्स विसर्ग धरणात येत आहे़ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९१ टक्के भरले असले तरी २५.३९२ टीएमसीचे काळम्मावाडी (दूधगंगा) धरण अद्याप ५४ टक्केच भरले आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सध्या ५८.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>जायकवाडी मृतसाठ्यातच जायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. पाणीपातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. गेल्या महिनाभरात जायकवाडी धरणात २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.