पुणो : नामदेव ढसाळ यांनी जीवनाच्या अखेरीर्पयत लढाऊ बाणा सोडला नाही. दलित पँथरनेही हा बाणा यापुढे जोपासावा. राजकीय आणि सामाजिक यश मिळविण्यासाठी दलितांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
दलित पँथरच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एस. डी. पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, आमदार जयदेव गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणो, बाळासाहेब कडलग उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘नामदेव ढसाळ हीच दलित पँथरची ओळख होती. ते आयुष्यभर दलितांच्या प्रगतीसाठी वाघासारखे लढले. या समाजामध्ये त्यांनी वेगळेच स्फुल्लिंग चेतविले होते. ती लढाऊवृत्ती पँथरने यापुढेही जपली पाहिजे. संघटना आणि नवा विचार त्यांनी निर्माण केला. त्याच्याशी सत्तेसाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही. प्रत्यक्ष कृतीतून ते दलितांच्या पाठीशी उभे राहिले. विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पँथरला बरोबर घेऊन निवडणूक लढू.’’
सोनवणो म्हणाले, ‘‘शिवशक्ती-भिमशक्तीमध्ये आमची उपेक्षा झाली. आमचे प्रश्न त्यांना सोडविता आले नाहीत. काँग्रेसला आमची व्यथा समजली नाही. त्यामुळे या दोन्हीपासून आम्ही दूर झालो. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी समाज विकायला काढला.’’ भगव्याने आमची अनेक आंदोलने मोडून काढली, अशा वेळी आमचा नेता मंत्रिपदाच्या मागे पळत आहे,’’ अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
अर्थसंकल्पावर टीका
4जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पावर टीका केली. ते म्हणाले, की रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये गरिबांचा विचार केलेला नाही. उद्या होणा:या अर्थसंकल्पातही वरवर पाहता अनेक चांगल्या योजना असतील. मात्र, त्याबरोबरच सर्वसामान्यांच्या खिशालाही चिमटा काढलेला असेल. पंतप्रधानांच्या योजनांचे सादरीकरण चांगले असते, मात्र त्यामागील खरे गणित सर्वसामान्यांना पचविता येणारे नसते.