शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

दलितांनी संघटित राहण्याची गरज

By admin | Updated: July 10, 2014 00:00 IST

राजकीय आणि सामाजिक यश मिळविण्यासाठी दलितांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

पुणो : नामदेव ढसाळ यांनी जीवनाच्या अखेरीर्पयत लढाऊ बाणा सोडला नाही. दलित पँथरनेही हा बाणा यापुढे जोपासावा. राजकीय आणि सामाजिक यश मिळविण्यासाठी दलितांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. 
दलित पँथरच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एस. डी. पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, आमदार जयदेव गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणो, बाळासाहेब कडलग उपस्थित होते. 
पाटील म्हणाले, ‘‘नामदेव ढसाळ हीच दलित पँथरची ओळख होती. ते आयुष्यभर दलितांच्या प्रगतीसाठी वाघासारखे लढले. या समाजामध्ये त्यांनी वेगळेच स्फुल्लिंग चेतविले होते. ती लढाऊवृत्ती पँथरने यापुढेही जपली पाहिजे. संघटना आणि नवा विचार त्यांनी निर्माण केला. त्याच्याशी सत्तेसाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही. प्रत्यक्ष कृतीतून ते दलितांच्या पाठीशी उभे राहिले. विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पँथरला बरोबर घेऊन निवडणूक लढू.’’
सोनवणो म्हणाले, ‘‘शिवशक्ती-भिमशक्तीमध्ये आमची उपेक्षा झाली. आमचे प्रश्न त्यांना सोडविता आले नाहीत. काँग्रेसला आमची व्यथा समजली नाही. त्यामुळे या दोन्हीपासून आम्ही दूर झालो. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी समाज विकायला काढला.’’ भगव्याने आमची अनेक आंदोलने मोडून काढली, अशा वेळी आमचा नेता मंत्रिपदाच्या मागे पळत आहे,’’ अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
 
अर्थसंकल्पावर टीका
4जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पावर टीका केली. ते म्हणाले, की रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये गरिबांचा विचार केलेला नाही. उद्या होणा:या अर्थसंकल्पातही वरवर पाहता अनेक चांगल्या योजना असतील. मात्र, त्याबरोबरच सर्वसामान्यांच्या खिशालाही चिमटा काढलेला असेल. पंतप्रधानांच्या योजनांचे सादरीकरण चांगले असते, मात्र त्यामागील खरे गणित सर्वसामान्यांना पचविता येणारे नसते.