शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

राज्यातील १२५ गावांतील दलित वस्त्यांचे रुपडे पालटणार

By admin | Updated: August 14, 2016 02:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी

- आनंद डेकाटे,  नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणी, वीजपुरवठा, विद्युत पथदिवे, सोलर दिवे, सार्वजनिक विहीर खोदाई व दुरुस्ती, समाज मंदिर बांधणे, जुने समाज मंदिर असल्यास दुुरुस्ती करणे, समाज मंदिरात वाचनालय, संगणक केंद्र (इंटरनेटसह) व्यवसाय प्रशिक्षण शाळा, व्यायाम शाळा (सर्व साहित्यासह) व छोटे सुसज्ज सभागृह असावे उभारण्यात येणार आहे. समाज मंदिरात महिला बचत गट प्रशिक्षणवर्ग, आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार व प्रसार कार्यशाळा, कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, महामंडळाच्या योजना, कौशल्य विकासावर आधरित प्रशिक्षण कार्यक्रम यांची एकत्रित अंमलबजावणी करणे, वस्तीतील युवकांसाठी युवा नेतृत्व शिबिर व कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देणे, आदी कामे दलित वस्तीमध्ये केली जातील. ही संपूर्ण विकास कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. राज्यातून १२५ गावांची निवड करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री उपाध्यक्ष राहतील. उपसचिव हे सदस्य सचिव राहतील. तर सचिव आणि समाज कल्याण आयुक्त हे सदस्य राहतील. येत्या १५ दिवसात या समितीला गावांची निवड करावयाची आहे. निवड झालेल्या गावांना महापुरुषांची नावे राज्यातील ज्या १२५ गावांमधील दलित वस्त्यांची निवड केली जाईल, त्या वस्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास ग्राम, संत रोहिदास विकास ग्राम, सावित्रीबाई फुले विकास ग्राम, राजर्षी शाहू महराज विकास ग्राम, महात्मा फुले विकास ग्राम, रमाई आंबेडकर विकास ग्राम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास ग्राम आदी महापुरुषांची नावे देण्यात यावी, असे आदेशही शासनाने बजावले आहेत.