शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १२५ गावांतील दलित वस्त्यांचे रुपडे पालटणार

By admin | Updated: August 14, 2016 02:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी

- आनंद डेकाटे,  नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणी, वीजपुरवठा, विद्युत पथदिवे, सोलर दिवे, सार्वजनिक विहीर खोदाई व दुरुस्ती, समाज मंदिर बांधणे, जुने समाज मंदिर असल्यास दुुरुस्ती करणे, समाज मंदिरात वाचनालय, संगणक केंद्र (इंटरनेटसह) व्यवसाय प्रशिक्षण शाळा, व्यायाम शाळा (सर्व साहित्यासह) व छोटे सुसज्ज सभागृह असावे उभारण्यात येणार आहे. समाज मंदिरात महिला बचत गट प्रशिक्षणवर्ग, आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार व प्रसार कार्यशाळा, कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, महामंडळाच्या योजना, कौशल्य विकासावर आधरित प्रशिक्षण कार्यक्रम यांची एकत्रित अंमलबजावणी करणे, वस्तीतील युवकांसाठी युवा नेतृत्व शिबिर व कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देणे, आदी कामे दलित वस्तीमध्ये केली जातील. ही संपूर्ण विकास कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. राज्यातून १२५ गावांची निवड करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री उपाध्यक्ष राहतील. उपसचिव हे सदस्य सचिव राहतील. तर सचिव आणि समाज कल्याण आयुक्त हे सदस्य राहतील. येत्या १५ दिवसात या समितीला गावांची निवड करावयाची आहे. निवड झालेल्या गावांना महापुरुषांची नावे राज्यातील ज्या १२५ गावांमधील दलित वस्त्यांची निवड केली जाईल, त्या वस्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास ग्राम, संत रोहिदास विकास ग्राम, सावित्रीबाई फुले विकास ग्राम, राजर्षी शाहू महराज विकास ग्राम, महात्मा फुले विकास ग्राम, रमाई आंबेडकर विकास ग्राम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास ग्राम आदी महापुरुषांची नावे देण्यात यावी, असे आदेशही शासनाने बजावले आहेत.