शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दलित संघटना आक्रमक

By admin | Updated: October 28, 2014 01:32 IST

जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ खा. रामदास आठवले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

जवखेडे हत्याकांडाचा निषेध : अहमदनगरसह राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे
अहमदनगर : जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ खा. रामदास आठवले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरीत्या हत्या करण्यात आली. या हत्या करणा:या नराधमांना पोलीस पकडणार आहे की नाही, असा 
सवाल करीत दोन दिवसांत घटनेचा तपास लावा अन्यथा जिल्हा 
बंद करू, असा इशारा आठवले 
यांनी दिला. तसेच दलित 
संघटना कोणत्याही समाजाच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
सोलापूर-कोल्हापुरातही निषेध  : क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन केल़े संत रोहिदास सामाजिक संघटनेत्नने निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली़ तर मिलिंदनगरत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जनजागृती मंचनेही निषेध नोंदवला़  तर कोल्हापुरात रिपाईतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (प्रतिनिधी)
 
‘जवखेडे हत्याकांड मानवजातीला कलंक’
पारनेर : दलित कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या पुरोगामी महाराष्ट्रात मानव जातीला कलंक आह़े याचा भ्रष्टाचार जन आंदोलन न्यासाच्यावतीने तीव्र निषेध नोंदवित असून, या प्रकरणी कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आह़े दलितांवरील हल्ले, हत्या थांबविण्यासाठी व्यापक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जनजागरण करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
 
च्पाथर्डी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जाधव यांचे मारेकरी निष्पन्न झालेले नसताना पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला, असा प्रश्न त्यांनी केला.
च्माङया 3क्-35 वर्षाच्या राजकीय इतिहासात एवढी क्रूर व निर्दयी घटना पाहण्यात नाही. आरोपींचा शोध घेऊन खरा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. पोलिसांना तपासाचे काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे ते म्हणाले. जाधव कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी घटनेच्या ठिकाणाची पाहणी केली. 
 
भुसावळमध्ये रास्ता रोको
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे भुसावळमध्ये रास्ता रोको, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निदर्शने तर राष्ट्रीय दलित पँथरने आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी प्रशासनास निवेदन दिले. रास्ता रोकोप्रकरणी 5क् कार्यकत्र्याना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली़
 
मुंबईतसह नवी मुंबईतही मोर्चा-निवेदने
मुंबई/नवी मुंबई : हत्याकांडाच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकत्र्यानी सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला. आरोपींना तात्काळ अटक करावी, न्यायालयाने त्यांना दंड ठोठवावा, तसेच अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, नवी मुंबईतही पाथर्डी हत्याकांडाचा निषेध भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आला.  या हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, यासंदर्भातील एक निवेदन नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आज देण्यात आले.