शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

‘सरकारच्या पळपुट्या धोरणामुळे दहीहंडीचा विचका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 05:02 IST

पोलिसांनी मोर्चेबांधणी केलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र पारंपरिक पद्धतीनेच दहीहंडी साजरी करण्याची भूमिका घेतली आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच दहीहंडी साजरी व्हावी यासाठी पोलिसांनी मोर्चेबांधणी केलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र पारंपरिक पद्धतीनेच दहीहंडी साजरी करण्याची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या पळपुट्या धोरणामुळेच दहीहंडी सणाचा विचका झाला आहे. कारवाई केल्यास हे प्रकरण भडकेल, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. जागतिक विक्रम रचणाऱ्या मुंबईच्या ‘जय जवान गोविंदा पथका’ने दहिहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जय जवानची याचिका फेटाळली. कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राज यांनी न्यायालयाच्या हेतुवरच प्रश्न उपस्थित केले. दहीहंडीसंदर्भात निर्णय देताना न्यायालयाने दुसरी बाजू समजूनच घेतली नाही. सरकारच्या पळपुट्या धोरणामुळे दहीहंडीचा विचका झाल्याचा आरोप राज यांनी केला. २०१३ सालच्या टोलविषयक याचिकेवर अजूनही तारीख पडत नाही. मात्र दहीहंडीसारख्या हिंदुंच्या सणांवर मात्र पटकन निर्णय होतात. हे हिंदुंचे सण बंद करण्याचे षडयंत्र आहे का, असा सवालही राज यांनी केला. दहीहंडीत नियमभंग झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. याबाबत विचारले असता राज म्हणाले की, ‘या लोकांनी इसिसच्या दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रीत करा. न्यायालयाबद्दल आदर आहेच, मात्र एकच बाजू ऐकून निर्णय घेणार असाल तर त्याला विरोध होणारच.’ >दहीहंडीवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी या लोकांनी इसिसच्या दहशतवाद्यांकडे लक्ष द्यावे. न्यायालयाविषयी आदर आहे, पण एकच बाजू समजून घेऊन निर्णय घेण्यात येणार असेल, तर विरोध करणारच.- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना