शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दाभोळ प्रकल्पातून रेल्वेला मिळणार वीज

By admin | Updated: November 21, 2015 02:43 IST

रेल्वेला लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रत्नागिरीतील दाभोळ वीज प्रकल्पाचा आधार घेतला आहे. या प्रकल्पातून रेल्वेला पुढील आठवड्यापासून वीजपुरवठ्याला

मुंबई : रेल्वेला लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रत्नागिरीतील दाभोळ वीज प्रकल्पाचा आधार घेतला आहे. या प्रकल्पातून रेल्वेला पुढील आठवड्यापासून वीजपुरवठ्याला सुरुवात होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पवन ऊर्जा - रेल्वे सेक्टरमध्ये संधी’ या विषयावर वाय.बी. चव्हाण सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रभू यांनी रेल भवन येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिसंवादात सहभाग घेतला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या परिसंवादात रेल्वे बोर्डाचे सदस्य (इलेक्ट्रीकल) नवीन टंडन, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. रेल्वे बोर्डाचे सदस्य (इलेक्ट्रीकल) नवीन टंडन यांनी पुढील पाच वर्षांत एक हजार मेगावॅट वीज सौरऊर्जा व पवनऊर्जेतून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. मुंबईतील रेल्वे स्थानकांनाही असणारी विजेची गरज पाहता सोलार पॅनलचा आधार घेण्यात येणार आहे. त्यासाठी उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या छतावर आणि इमारतींवर सोलार पॅनल बसविण्यात येईल. यातून वीज निर्माण केली जाणार असल्याची माहिती टंडन यांनी या वेळी दिली. चर्चगेट स्थानकाच्या छपरावर लवकरच येत्या काळात सोलार पॅनल बसविण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)प्रभू म्हणाले...रेल्वेची विजेची गरज भविष्यात वाढू शकते. त्यामुळे सौरऊर्जा व पवनऊर्जेतून जास्तीतजास्त वीज निर्मिती करणे आवश्यक असून, तसे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या खासगी वीज कंपन्यांकडून ज्या दराने वीज मिळते त्यापेक्षा अर्ध्या दराने दाभोळ प्रकल्पातून वीज मिळेल आणि पुढील आठवड्यापासून त्याचा पुरवठा सुरू होईल.