शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

ठाणे पालिका आयुक्तांची दबंगगिरी

By admin | Updated: May 12, 2017 01:49 IST

आपला संयत स्वभाव आणि आक्रमक प्रशासकीय निर्णयाकरिता ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपला संयत स्वभाव आणि आक्रमक प्रशासकीय निर्णयाकरिता ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे रौद्ररूप गुरुवारी ठाण्यातील नागरिकांनी पाहिले. गावदेवी भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यामुळे संतापलेल्या जयस्वाल यांनी या परिसरातील सर्वच गाळे तोडून टाकण्याचे आदेश दिले. टी. चंद्रशेखर आयुक्त असताना रस्ता रुंदीकरणानंतर खुद्द महापालिकेने पुनर्वसन केलेल्या गाळेधारकांवर संतापाच्या भरात कारवाई केली गेली. आयुक्तांच्या दबंगगिरीतून रिक्षा युनियनचे अध्यक्षदेखील सुटले नाहीत. खुद्द जयस्वाल व त्यांच्या सुरक्षारक्षकांनी बेशिस्त रिक्षाचालकांना केलेल्या मारहाणीनंतर स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारला.बुधवारी सायंकाळी गोखले रोडवरील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर पालिकेचे उपायुक्त माळवी यांनी आपला मोर्चा गावदेवी येथील फेरीवाल्यांकडे वळवला. येथील एकवीरा पोळीभाजी केंद्राच्या मालकाने आपला पैशांचा गल्ला बाहेर काढला होता. त्याला तो आत घेण्यास माळवी यांनी सांगितल्यानंतर वाद उफाळून आला. या वेळी माळवी यांचा पोळीभाजी केंद्रावर आलेल्या ग्राहकांशीही वाद झाल्याचे समजते. त्यानंतर, फेरीवाले व काही नागरिक यांनी माळवी यांना बेदम मारहाण केली. जमावाच्या ताब्यातून त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने कसेबसे बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपाचार सुरू असून गुरुवारी अतिदक्षता विभागातून त्यांना सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या देशपांडे पितापुत्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी सकाळपासून उमटले. आयुक्त जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यामध्ये माळवी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यापुढे मी स्वत: या भागात रोज पाहणी करून येथे एकही फेरीवाला बसू देणार नसल्याचा इशारा जयस्वाल यांनी दिला होता. फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यानंतर, सायंकाळी ४ च्या सुमारास पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक गावदेवी येथे पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. या वेळी येथील सर्वच गाळे बंद होते. तसेच आजूबाजूच्या दुकानदारांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली होती. सुरुवातीला अतिक्रमण विभागाने एकवीरा पोळीभाजी केंद्रातील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर, त्यांनी केलेले अतिक्रमण पाडून हा गाळा सील केला. त्यानंतर, आजूबाजूचे गाळेदेखील सील करण्यात आले. परंतु, काही वेळातच बाजूच्या गाळ्यांचे सील काढण्यात आले. मात्र, येथील पाण्याच्या टाक्या काढण्यात आल्या. कारवाई आटोपून पथक पुन्हा माघारी निघत असतानाच आयुक्त जयस्वाल घटनास्थळी दाखल झाले. १० ते १५ मिनिटे त्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर येथील सर्वच गाळे तोडण्याचे आदेश दिले. लागलीच अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोकलेनच्या साहाय्याने गाळे तोडण्याची कारवाई सुरू केली. अचानक आपले गाळे जमीनदोस्त होताना पाहून हादरलेल्या गाळेधारकांनी आतील साहित्य बाहेर काढण्याकरिता धावाधाव सुरू केली. त्यांना पोलीस व आयुक्तांसोबत असलेल्या बाउन्सर्सनी प्रसाद दिला. काही गाळेधारकांनी जयस्वाल यांना भेटून ‘साहेब, आमची काय चूक आहे. आमची दुकाने का तोडता’, अशी विनंती करताच आयुक्तांनी ‘हमारे आदमी को मारा, तब तुम कहा थे’, असे सुनावत कारवाई थांबणार नाही, असे निक्षून सांगितले. येथील तब्बल ३० गाळ्यांवर अतिक्रमण विभागाने हातोडा टाकला. टी. चंद्रशेखर आयुक्त असताना ठाण्यात झालेल्या रस्ता रुंदीकरणाच्या वेळी कायदेशीर असलेल्या परंतु रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या गाळेधारकांचे येथे पुनर्वसन केले होते. त्यामुळे आता संतापाच्या भरात केलेल्या या कारवाईचे न्यायालयात महापालिका कसे समर्थन करणार, असा सवाल गाळेधारक करीत आहेत. समोरील दुकानदारालादेखील आयुक्तांनी सज्जड दम भरला. त्यावर आपले दुकान कायदेशीर असल्याचे त्या दुकानदाराने सांगताच आमच्या माणसाला मारले, तेव्हा तू काय करत होता, असे जयस्वाल यांनी त्या दुकानदाराला सुनावले. बेकायदा फेरीवाले व रिक्षावाले यांना वठणीवर आणलेच पाहिजे. मात्र, त्याकरिता जयस्वाल यांच्यासारख्या ठाणेकरांच्या आदरास पात्र ठरलेल्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात दबंगगिरी न करता नियमानुसार कारवाई करावी, असे पालिकेतील लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.