शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

ठाणे पालिका आयुक्तांची दबंगगिरी

By admin | Updated: May 12, 2017 01:49 IST

आपला संयत स्वभाव आणि आक्रमक प्रशासकीय निर्णयाकरिता ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपला संयत स्वभाव आणि आक्रमक प्रशासकीय निर्णयाकरिता ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे रौद्ररूप गुरुवारी ठाण्यातील नागरिकांनी पाहिले. गावदेवी भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यामुळे संतापलेल्या जयस्वाल यांनी या परिसरातील सर्वच गाळे तोडून टाकण्याचे आदेश दिले. टी. चंद्रशेखर आयुक्त असताना रस्ता रुंदीकरणानंतर खुद्द महापालिकेने पुनर्वसन केलेल्या गाळेधारकांवर संतापाच्या भरात कारवाई केली गेली. आयुक्तांच्या दबंगगिरीतून रिक्षा युनियनचे अध्यक्षदेखील सुटले नाहीत. खुद्द जयस्वाल व त्यांच्या सुरक्षारक्षकांनी बेशिस्त रिक्षाचालकांना केलेल्या मारहाणीनंतर स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारला.बुधवारी सायंकाळी गोखले रोडवरील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर पालिकेचे उपायुक्त माळवी यांनी आपला मोर्चा गावदेवी येथील फेरीवाल्यांकडे वळवला. येथील एकवीरा पोळीभाजी केंद्राच्या मालकाने आपला पैशांचा गल्ला बाहेर काढला होता. त्याला तो आत घेण्यास माळवी यांनी सांगितल्यानंतर वाद उफाळून आला. या वेळी माळवी यांचा पोळीभाजी केंद्रावर आलेल्या ग्राहकांशीही वाद झाल्याचे समजते. त्यानंतर, फेरीवाले व काही नागरिक यांनी माळवी यांना बेदम मारहाण केली. जमावाच्या ताब्यातून त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने कसेबसे बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपाचार सुरू असून गुरुवारी अतिदक्षता विभागातून त्यांना सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या देशपांडे पितापुत्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी सकाळपासून उमटले. आयुक्त जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यामध्ये माळवी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यापुढे मी स्वत: या भागात रोज पाहणी करून येथे एकही फेरीवाला बसू देणार नसल्याचा इशारा जयस्वाल यांनी दिला होता. फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यानंतर, सायंकाळी ४ च्या सुमारास पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक गावदेवी येथे पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. या वेळी येथील सर्वच गाळे बंद होते. तसेच आजूबाजूच्या दुकानदारांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली होती. सुरुवातीला अतिक्रमण विभागाने एकवीरा पोळीभाजी केंद्रातील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर, त्यांनी केलेले अतिक्रमण पाडून हा गाळा सील केला. त्यानंतर, आजूबाजूचे गाळेदेखील सील करण्यात आले. परंतु, काही वेळातच बाजूच्या गाळ्यांचे सील काढण्यात आले. मात्र, येथील पाण्याच्या टाक्या काढण्यात आल्या. कारवाई आटोपून पथक पुन्हा माघारी निघत असतानाच आयुक्त जयस्वाल घटनास्थळी दाखल झाले. १० ते १५ मिनिटे त्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर येथील सर्वच गाळे तोडण्याचे आदेश दिले. लागलीच अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोकलेनच्या साहाय्याने गाळे तोडण्याची कारवाई सुरू केली. अचानक आपले गाळे जमीनदोस्त होताना पाहून हादरलेल्या गाळेधारकांनी आतील साहित्य बाहेर काढण्याकरिता धावाधाव सुरू केली. त्यांना पोलीस व आयुक्तांसोबत असलेल्या बाउन्सर्सनी प्रसाद दिला. काही गाळेधारकांनी जयस्वाल यांना भेटून ‘साहेब, आमची काय चूक आहे. आमची दुकाने का तोडता’, अशी विनंती करताच आयुक्तांनी ‘हमारे आदमी को मारा, तब तुम कहा थे’, असे सुनावत कारवाई थांबणार नाही, असे निक्षून सांगितले. येथील तब्बल ३० गाळ्यांवर अतिक्रमण विभागाने हातोडा टाकला. टी. चंद्रशेखर आयुक्त असताना ठाण्यात झालेल्या रस्ता रुंदीकरणाच्या वेळी कायदेशीर असलेल्या परंतु रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या गाळेधारकांचे येथे पुनर्वसन केले होते. त्यामुळे आता संतापाच्या भरात केलेल्या या कारवाईचे न्यायालयात महापालिका कसे समर्थन करणार, असा सवाल गाळेधारक करीत आहेत. समोरील दुकानदारालादेखील आयुक्तांनी सज्जड दम भरला. त्यावर आपले दुकान कायदेशीर असल्याचे त्या दुकानदाराने सांगताच आमच्या माणसाला मारले, तेव्हा तू काय करत होता, असे जयस्वाल यांनी त्या दुकानदाराला सुनावले. बेकायदा फेरीवाले व रिक्षावाले यांना वठणीवर आणलेच पाहिजे. मात्र, त्याकरिता जयस्वाल यांच्यासारख्या ठाणेकरांच्या आदरास पात्र ठरलेल्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात दबंगगिरी न करता नियमानुसार कारवाई करावी, असे पालिकेतील लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.