शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

डी.एड्. कॉलेजचे वर्ग रिकामे

By admin | Updated: July 2, 2015 00:24 IST

विद्यार्थ्यांअभावी १0 महाविद्यालये बंद : जागा १७१८, अर्ज मात्र ४९७ -- लोकमत विशेष

अशोक डोंबाळे - सांगलीजिल्ह्यात सहा अनुदानित आणि २९ खासगी अशी ३५ अध्यापक (डी.एड्.) महाविद्यालये आहेत. त्यात १७१८ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, यंदा केवळ ४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत! उर्वरित १२२२ जागा शिल्लक राहणार असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना कुलूप लागणार आहे. गेल्यावर्षी विद्यार्थीच मिळाले नसल्याने दहा महाविद्यालये बंद झाली आहेत. भावी गुरुजींचे वर्ग यंदाही रिकामेच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. डी.एड्.ला प्रवेश मिळविण्यासाठी मागील आठ-दहा वर्षांमध्ये गर्दी होती. सांगली जिल्ह्यात पाच ते सात हजार अर्जांची विक्री होऊन तेवढेच विद्यार्थी प्रवेशासाठीही गर्दी करीत. मात्र प्राथमिक शाळांमध्ये नोकरीच मिळत नसल्याने गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांनी डी.एड्.कडे पाठ फिरवली आहे. शासनाने शिक्षकांच्या नोकरीसाठी पात्रता परीक्षा (सीईटी) सुरू केली आहे. जिल्हा परिषदेकडील दहा ते पंधरा शाळा दरवर्षी बंद होत आहेत. नव्याने नोकरभरती थांबली आहे. यामुळे तरुणांचा डी.एड्.कडे प्रवेशाचा कल कमी झाला आहे. परिणामी डी. एड्. महाविद्यालये बंद पडू लागली आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित अशा ३५ महाविद्यालयांमध्ये १७१८ विद्यार्थी क्षमता होती. मात्र केवळ ६५० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. अनेक महाविद्यालयांत केवळ चार ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश होते. परिणामी दहा महाविद्यालये बंद पडली. तेथील काही शिक्षकांना घरी जावे लागले, तर काहींना त्याच संस्थेत सामावून घेतले आहे. यंदा १७१८ विद्यार्थ्यांची क्षमता आहे, पण केवळ ४९६ विद्यार्थ्यांनीच अर्ज केल्यामुळे उर्वरित १२२२ जागा रिक्त राहाणार आहेत. यावर्षी पुन्हा दहा ते पंधरा डी.एड्. महाविद्यालयांना कुलूप ठोकावे लागणार आहे. यामुळे नव्याने चाळीस ते पन्नास शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू शासनाच्या नियमानुसार डी.एड. महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची पहिली फेरी दि. ३० जूनपासून सुरु झाली आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला नाही. यामुळे यावर्षी ४९६ अर्ज नेलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्व प्रवेश घेतील की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.२०१० पासून शिक्षकांची नोकरभरती पूर्ण थांबली आहे. शिवाय, राज्य शासनाने नोकरीसाठीची पात्रता परीक्षा सुरू केली आहे. या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा डी.एड्. अभ्यासक्रमाकडील कल आता कमी होत आहे. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. - पी. व्ही. जाधव, प्राचार्य, अध्यापक विद्यालय, सांगली.