शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
3
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
4
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
5
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
6
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
7
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
8
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
9
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
10
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
11
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
12
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
13
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
14
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
15
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
16
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
17
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
18
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
19
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
20
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

सायबर सुरक्षेचे प्रस्ताव आता थेट मंत्रिमंडळापुढे

By admin | Updated: June 10, 2016 05:21 IST

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांना आता अधिक बळकटी मिळणार

जमीर काझी,

मुंबई- राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांना आता अधिक बळकटी मिळणार आहे. राज्यस्तरीय सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आॅनलाइन फसवणूक व सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक असलेला एखादा प्रस्ताव बनवून थेट मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी मांडता येणार आहे. सायबर सुरक्षा प्रकल्पातर्गंत राज्यातील प्रत्येक आयुक्तालय, जिल्हा व विभागामध्ये सायबर क्राईम लॅब स्थापन करून त्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यांच्याकडून गुन्हेगारांना विनाविलंब पकडण्यासाठी विशेष उपाययोजना राबविली जाणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. आॅनलाईन खरेदी, विक्रीच्या नावे कोट्यवधींची लुबाडणूक केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार व बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याने अनेकजण त्याला बळी पडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी जूनमध्ये सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी विशेष समितीची स्थापना केली होती, मात्र सायबर गुन्ह्यांची व्याप्ती मुंबईपुरता मर्यादित न राहता अन्य शहरे व ग्रामीण भागांतही पोहोचल्याने गृह विभागाच्या अख्यत्यारित त्याबाबत राज्यस्तरीय सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सायबर प्रकल्प राबविण्यासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली विशेषाधिकार समिती स्थापन करण्यात आली आली आहे. सातजणांच्या समितीमध्ये विशेष निरीक्षक हे सदस्य सचिव राहणार असून त्याव्यतिरिक्त वित्त व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, राज्य गुप्त वार्ता विभाग व मुंबई पोलीस दलाचे आयुक्त सदस्य म्हणून कार्यरत राहतील. त्यांनी सायबर सुरक्षेबाबत एखादा प्रस्ताव, उपाययोजना मांडल्यास पहिल्यांदा तो संबंधित मंत्र्यांपुढे मंजुरीसाठी सादर करावा लागणार नाही, तो प्रस्ताव थेट मंजूरीसाठी मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. >समितीला मिळालेले अधिकारसायबर क्राईम रोखण्यासाठी आवश्यक तज्ज्ञांची निवड राज्य पोलीस दलाकडून करण्यात येईल किंवा आऊटसोर्सिंगद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करता येईल.तांत्रिक सल्लागार समितीमध्ये तज्ज्ञ व अन्य सदस्यांची नेमणूक समितीला करता येणार आहे.सायबर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार समिती कार्यरत राहिल. त्यांच्याशिवाय ती अन्य कोणालाही जबाबदार असणार नाही.