शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
2
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
3
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
4
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
5
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
6
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
7
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
8
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
9
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
10
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
11
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
12
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
13
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
14
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
15
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
16
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
17
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
18
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
19
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
20
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सुरक्षेचे प्रस्ताव आता थेट मंत्रिमंडळापुढे

By admin | Updated: June 10, 2016 05:21 IST

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांना आता अधिक बळकटी मिळणार

जमीर काझी,

मुंबई- राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांना आता अधिक बळकटी मिळणार आहे. राज्यस्तरीय सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आॅनलाइन फसवणूक व सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक असलेला एखादा प्रस्ताव बनवून थेट मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी मांडता येणार आहे. सायबर सुरक्षा प्रकल्पातर्गंत राज्यातील प्रत्येक आयुक्तालय, जिल्हा व विभागामध्ये सायबर क्राईम लॅब स्थापन करून त्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यांच्याकडून गुन्हेगारांना विनाविलंब पकडण्यासाठी विशेष उपाययोजना राबविली जाणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. आॅनलाईन खरेदी, विक्रीच्या नावे कोट्यवधींची लुबाडणूक केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार व बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याने अनेकजण त्याला बळी पडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी जूनमध्ये सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी विशेष समितीची स्थापना केली होती, मात्र सायबर गुन्ह्यांची व्याप्ती मुंबईपुरता मर्यादित न राहता अन्य शहरे व ग्रामीण भागांतही पोहोचल्याने गृह विभागाच्या अख्यत्यारित त्याबाबत राज्यस्तरीय सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सायबर प्रकल्प राबविण्यासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली विशेषाधिकार समिती स्थापन करण्यात आली आली आहे. सातजणांच्या समितीमध्ये विशेष निरीक्षक हे सदस्य सचिव राहणार असून त्याव्यतिरिक्त वित्त व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, राज्य गुप्त वार्ता विभाग व मुंबई पोलीस दलाचे आयुक्त सदस्य म्हणून कार्यरत राहतील. त्यांनी सायबर सुरक्षेबाबत एखादा प्रस्ताव, उपाययोजना मांडल्यास पहिल्यांदा तो संबंधित मंत्र्यांपुढे मंजुरीसाठी सादर करावा लागणार नाही, तो प्रस्ताव थेट मंजूरीसाठी मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. >समितीला मिळालेले अधिकारसायबर क्राईम रोखण्यासाठी आवश्यक तज्ज्ञांची निवड राज्य पोलीस दलाकडून करण्यात येईल किंवा आऊटसोर्सिंगद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करता येईल.तांत्रिक सल्लागार समितीमध्ये तज्ज्ञ व अन्य सदस्यांची नेमणूक समितीला करता येणार आहे.सायबर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार समिती कार्यरत राहिल. त्यांच्याशिवाय ती अन्य कोणालाही जबाबदार असणार नाही.