शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात अखेर कपात

By admin | Updated: July 13, 2016 20:23 IST

प्रवासी व मालवाहतूक वाहतूक करणा-या वाहनांच्या परवाना शुल्क तसेच परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात राज्यशासनाने अखेर कपात केली

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 13 - प्रवासी व मालवाहतूक वाहतूक करणा-या वाहनांच्या परवाना शुल्क तसेच परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात राज्यशासनाने अखेर कपात केली आहे. या शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आल्यानंतर राज्यभरातील प्रवासी वाहतूक करणा-या संघटनांनी या निर्णयास जोरदार विरोध करत ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर राज्यशासनाने एक पाऊस मागे घेत या शुल्कात काही प्रमाणात कपात करून वाहतूकदारांना दिलासा दिला आहे. याबाबतचे नवीन आदेश मंगळवारी काढण्यात आले. गृह विभागाने महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ मधील नियम ७५ मधील परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी मोटार वाहनांकरीता नवीन परवाने, परवाना नुतनीकरण, राष्ट्रीय परवाना, पर्यटक परवाना, तात्पुरता परवाना प्रतिस्वाक्षरी परवाना आदीच्या दरात वाढ केली होती. १० फेब्रुवारी २०१६ रोजी याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार वाहनांच्या नुतनीकरणाचा दंडाच्या रकमेतही राज्यशासनाने पन्नास पटीने वाढवित प्रतिमहिना १०० रूपयांवरून तब्बल ५ हजार रुपये करण्यात आला होता. त्याचा सर्वाधिक फटका रिक्षाधारकांना बसणार होता. या शिवाय त्या आदेशानुसार, काळी-पिवळी मीटर असलेल्या टॅक्सी व रिक्षाचे नवीन नुतनीकरण १००० रुपये पर्यटक कॅब आणि पर्यटक वाहनांसाठी नवीन नुतनीकरणासाठी 5 हजार रूपये रक्कम निश्चित करण्यात आली होती. या विरोधात राज्यभरातील प्रवासी व मालवाहतूक संघटनांनी आंदोलन तसेच बंद मार्ग स्विकारल्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आंदोलकांची ५ मार्च २०१६ ला मुंबईत बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सुधारीत शुल्क लागू करण़्यात आले आहे. असे आहेत परवाना शुल्कामधील नवीन बदल परवाना शुल्काचे सर्वाधिक उत्पन्न मिळणा-या मीटर टँक्सी व रिक्षा, मीटर नसलेल्या कँब, मँक्सी कँब, कंत्राटी परवाना बस, टप्पा वाहतूक वाहने, खासगी प्रवासी वाहने, मालवाहू वाहने यांच्या नुतनीकरणासाठी 1 हजार रूपये शुल्क निश्चित करण्यात आले होते ते ५०० रूपयंनी कमी करण्यात आले आहे. तर टूरीस्ट टँक्सी व मालवाहतूक करणा-या वाहनांचे राष्ट्रीय परवान्यांचे दर २ हजारांवरून १५०० रूपये करण्यात आले आहेत. या शिवाय तात्पुरत्या प्रवासासाठीच्या बसचे विशेष परवाना शुल्क एक हजार रूपयांवरून ३०० रूपये करण्यात आले आहे. तर रिक्षा परवाना नुतनीकरणास एका महिन्याच्या विलंबा नंतर आकारण्यात येणारा 5 हजार रूपयांचा दंड या पुढे १५ त २ महिने २०० रूपये, १ ते ४ महिने ५०० रूपये, ४ ते ६ महिने १ हजार रूपये, ६ ते ८ महिने २ हजार रूपये, ८ ते १० महिने ४ हजार रूपये व एका वर्षानंतर तो 5 हजार रूपये आकारण्यात येणार आहे.