शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आता महावितरण येणार ग्राहकांच्या दारी

By admin | Updated: May 26, 2015 02:29 IST

गावागावांत जाऊन करणार तक्रारींचा निपटारा.

अकोला: विद्युत जोडणी घेणे, नादुरुस्त फिडरपासून त्रस्त असणे, तसेच शहर व ग्रामीण भागात येणार्‍या विजेच्या समस्या सोडविण्याकरिता ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नसून, महावितरणच ग्राहकांच्या दारी येणार आहे. महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी गावागावांत जाऊन ग्राहकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचा निपटारा करणार आहेत. ग्राहकांना सुविधा मिळावी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता महावितरणच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत महावितरण व राजकीय पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात मुख्य अभियंता यांनी सदर नियोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील रोहित्रांमध्ये असलेल्या विविध समस्या, नवीन विद्युत जोडण्या, सिंगल फेज, थ्री फेज विद्युत पुरवठा गावांमध्ये सुरू करणे, शेतकर्‍यांपयर्ंत विद्युत पुरवठा पुरविणे, शेतात कृषिपं पांना वीज जोडणी देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. या पथकामध्ये महावितरणच्या विभागीय मंडळाचा मुख्य अभियंता, विभागीय ग्रामीण कार्यकारी अभियं ता, जिल्हा कार्यालय कार्यकारी अभियंता, तालुका उपकार्यकारी अभियंता, लेखाधिकारी व तालुक्यातील सर्व कनिष्ठ अभियंता तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.