शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीज बिलांमुळे ग्राहक हैराण

By admin | Updated: September 10, 2016 02:00 IST

महावितरण कंपनीकडून येणाऱ्या विजेच्या वारेमाप बिलांमुळे डोंबिवलीतील ग्राहक हैराण झाले आहेत.

डोंबिवली : महावितरण कंपनीकडून येणाऱ्या विजेच्या वारेमाप बिलांमुळे डोंबिवलीतील ग्राहक हैराण झाले आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला आहे. बिलांबाबत तक्रारी, शंका असल्यास पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहन पक्षाचे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर यांनी केले आहे.बीडवाडकर आणि केडीएमसीच्या ‘ग’ प्रभाग समितीचे सभापती मुकुंद पेडणेकर यांनी दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या भोंगळ कारभाराची पोलखोल करत एका ग्राहकाच्या बिलातील सुमारे ९०० रुपये कमी करून घेतले. या घटनेमुळे अधिकाऱ्यांची मर्जी असेल वाढीव बील तर कमी करता येते, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे माजी नगरसेवक भाई देसाई यांनाही वाढीव बिलासंदर्भात शंका आल्याने त्यांनी बाजीप्रभू चौकातील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, असे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे देसाई यांनी बीडवाडकर यांनी एमआयडीसीतील महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. देसार्इंनी समायोजित रक्कम म्हणजे काय, व ती का आकारली आहे, याचे स्पष्टीकरण मागितले. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. त्यांनी तातडीने त्यांच्या बिलातील ९०० रुपये रक्कम कमी केले, असे बीडवाडकर म्हणाले. यावरूनच समायोजीत रक्कम ग्राहकांवर लादली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलासंदर्भात तक्रारी-शंका असल्यास ‘महावितरण’कडे दाद मागावी. तेथे समाधान न झाल्यास भाजपाच्या पूर्वेतील राथ रोडवरील कार्यालयात संपर्क साधावा, असे ते म्हणाले. त्यासाठी पक्षाने काढलेला फार्म भरून द्यावा. कार्यकर्ते त्यांच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करतील. संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याची दाद मागतील. त्यावरही समाधान न झाल्यास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दाद मागितली जाईल, असे बीडवाडकर म्हणाले. (प्रतिनिधी)>समायोजित रक्कम म्हणजे काय?समायोजित रकमेबाबत बीडवाडकर म्हणाले की, विजेची गळती आणि त्यातील रकमेची तूट आकारण्याची विशेष तरतूद बिलात असते. बहुतांशी ग्राहकांच्या बिलात ती कमी-जास्त प्रमाणात असू शकते. पण कोणीतरी केलेल्या विजचोरीची तूट अथवा वीजगळतीचा भुर्दंड नियमित बिल भरणाऱ्यांना का, असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वसामान्य ग्राहकांवरील अन्याय तातडीने दूर व्हावा, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे, असे बीडवाडकर म्हणाले.