शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

नवमतदारांमध्येही उत्सुकता!

By admin | Updated: October 13, 2014 22:53 IST

अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार हा निर्णायक ठरल्याचे म्हटले जाते. या लोकसभेच्या निमित्ताने प्रथमच नवमतदार आणि त्याचं अस्तित्त्व यावर बोललं गेलं.

मुंबई : अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार हा निर्णायक ठरल्याचे म्हटले जाते. या लोकसभेच्या निमित्ताने प्रथमच नवमतदार आणि त्याचं अस्तित्त्व यावर बोललं गेलं. सोशल मीडियावर केलेल्या प्रचार आणि प्रसाराचाच हा परिणाम दिसून आला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही हे नवमतदार आपल्या मतदानाची ताकद दाखवून देणार का हे पाहणो, औत्सुक्याचे ठरेल.
 
लोकसभा निवडणुकीत तरुणाईला बदल हवा होता आणि तो निकालाअंती मिळालाही. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत तरुणाईला आपलेसे करण्याचा प्रयत्न सर्वच राज्यकत्र्याकडून होताना दिसतोय. त्यात युती आणि आघाडीच्या ‘घटस्फोटा’नंतर राज्यातील समीकरण वेगाने बदलली. त्यामुळे ‘पंचरंगी’ लढतीमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवे राजकीय वादळ आल्याचेही म्हटले जाते. प्रचाराच्या रणधुमाळीतील आरोप-प्रत्यारोप असो, जागावाटपाचा वाद असो वा मुख्यमंत्रिपदाची लालसा या सगळ्या मुद्दय़ांबाबत नवमतदारांना नेमके काय वाटते हेच जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय..
 
मुख्यमंत्री कोण?
पंचरंगी लढतीमुळे यंदा ‘मुख्यमंत्री’ पदाच्या स्पर्धेत असणा:यांनी प्रचारादरम्यान चांगलाच जोर लावला. यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत राहिली. याबाबत, तरुणांना विचारले असता मुख्यमंत्रिपदासाठी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा असल्याचे दिसून आले. मात्र, यंदा या पदाच्या दावेदारांबाबत तरुणाई फारशी खूश नसल्याचे दिसून आले.
 
पक्ष महत्त्वाचा की उमेदवार?
लोकसभा निवडणुकीच्या लढतीत साठीच्या नरेंद्र मोदींनी बाजी मारत तरुण पिढीतल्या राहुल गांधींवर मात केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणाईसाठी ‘आयडॉल’ ठरले. पण आता विधानसभा निवडणुकीत नवमतदारांची पंचाईत झाली आहे. युती आणि आघाडी तुटल्यामुळे प्रमुख पाचही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे हे नवमतदार अधिकच संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आता ‘पक्षनिष्ठा’ आणि ‘उमेदवाराचा चेहरा’ या दोहोंमधील गोंधळ नवमतदारांसाठी गुंतागुंतीचा ठरत आहे.
 
वाद जागावाटपाचा 
केवळ जागावाटपाच्या ‘ताणाताणी’मुळे युती आणि आघाडीचा संसार मोडला. ही समीकरणं आधीपासून ठरलेली असतानाही या राज्यकत्र्यानी दीड-दोन आठवडे मतदारांची अवस्था ‘त्रिशंकू’प्रमाणो केली. या जागावाटपाच्या तिढय़ाबद्दल तरुणाईच्या मनात रोष असून आता वेगळे झाल्यानंतरही विकासाच्या मुद्दय़ावर न बोलता हे राज्यकर्ते केवळ एकमेकांची उणीदुणी काढतायत, असे तरुणाईचे म्हणणो आहे.
 
नुसतेच ‘आरोप-प्रत्यारोप’
प्रचाराने वेग धरल्यानंतर राज्यभरात प्रचाराचा ‘बोलबाला’ होण्याऐवजी राज्यकत्र्यानी एकमेकावंर घेतलेल्या ‘तोंडसुखा’ची अधिकच चर्चा झाली. मग त्यात ब्ल्यू प्रिंट, व्हिजन डॉक्युमेंट, दृष्टिपत्र, जाहीरनामा या वेगवेगळ्या शब्दांची ‘अदलाबदल’ करत सगळ्यांनीच विकासाचा आराखडा मांडला. मात्र त्यानंतर विकासाच्या मुद्दय़ाला बगल देत केवळ एकमेकांची ‘अब्रू’ दावणीला बांधण्याकडेच या राज्यकत्र्याचा कल दिसून आला. या आरोप-प्रत्यारोपांबद्दल तरुणाईच्या मनात प्रचंड चीड असून यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करणारे राज्यकर्ते असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली.
 
निवडणुकीपूर्वीच गणितं बिघडलेल्या राजकीय पक्षांनी आधीच रंग दाखविले आहेत. त्यामुळे या पंचरंगी लढतीत नेमका कुणावर विश्वास ठेवावा, याबद्दल अजूनही संभ्रम आहेच. पण एकूणच सर्व मुद्दय़ांचा विचार करून तरुण पिढीचा विचार करणा:या उमेदवारालाच मत देणार आहे.
- मुकुलिना कोलते, 
नवमतदार
 
सगळेच पक्ष एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असल्यामुळे गोंधळ वाढला आहे. मात्र यातही सोशल मीडियाच्या जाहिरातींना भुरळून न जाता योग्य पक्ष आणि उमेदवारालाच मत देण्याचा निर्धार केला आहे.
- अक्षया घाडी, 
नवमतदार 
 
राज्यातील पाचही प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे तरुणाई गोंधळली आहे. मात्र हल्ली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईने मतदान करून जबाबदारी बजावली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत योग्य उमेदवारालाच आम्ही मतदान करू.
- अदिश्री सहस्रबुद्धे, 
नवमतदार