शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदारांमध्येही उत्सुकता!

By admin | Updated: October 13, 2014 22:53 IST

अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार हा निर्णायक ठरल्याचे म्हटले जाते. या लोकसभेच्या निमित्ताने प्रथमच नवमतदार आणि त्याचं अस्तित्त्व यावर बोललं गेलं.

मुंबई : अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार हा निर्णायक ठरल्याचे म्हटले जाते. या लोकसभेच्या निमित्ताने प्रथमच नवमतदार आणि त्याचं अस्तित्त्व यावर बोललं गेलं. सोशल मीडियावर केलेल्या प्रचार आणि प्रसाराचाच हा परिणाम दिसून आला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही हे नवमतदार आपल्या मतदानाची ताकद दाखवून देणार का हे पाहणो, औत्सुक्याचे ठरेल.
 
लोकसभा निवडणुकीत तरुणाईला बदल हवा होता आणि तो निकालाअंती मिळालाही. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत तरुणाईला आपलेसे करण्याचा प्रयत्न सर्वच राज्यकत्र्याकडून होताना दिसतोय. त्यात युती आणि आघाडीच्या ‘घटस्फोटा’नंतर राज्यातील समीकरण वेगाने बदलली. त्यामुळे ‘पंचरंगी’ लढतीमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवे राजकीय वादळ आल्याचेही म्हटले जाते. प्रचाराच्या रणधुमाळीतील आरोप-प्रत्यारोप असो, जागावाटपाचा वाद असो वा मुख्यमंत्रिपदाची लालसा या सगळ्या मुद्दय़ांबाबत नवमतदारांना नेमके काय वाटते हेच जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय..
 
मुख्यमंत्री कोण?
पंचरंगी लढतीमुळे यंदा ‘मुख्यमंत्री’ पदाच्या स्पर्धेत असणा:यांनी प्रचारादरम्यान चांगलाच जोर लावला. यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत राहिली. याबाबत, तरुणांना विचारले असता मुख्यमंत्रिपदासाठी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा असल्याचे दिसून आले. मात्र, यंदा या पदाच्या दावेदारांबाबत तरुणाई फारशी खूश नसल्याचे दिसून आले.
 
पक्ष महत्त्वाचा की उमेदवार?
लोकसभा निवडणुकीच्या लढतीत साठीच्या नरेंद्र मोदींनी बाजी मारत तरुण पिढीतल्या राहुल गांधींवर मात केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणाईसाठी ‘आयडॉल’ ठरले. पण आता विधानसभा निवडणुकीत नवमतदारांची पंचाईत झाली आहे. युती आणि आघाडी तुटल्यामुळे प्रमुख पाचही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे हे नवमतदार अधिकच संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आता ‘पक्षनिष्ठा’ आणि ‘उमेदवाराचा चेहरा’ या दोहोंमधील गोंधळ नवमतदारांसाठी गुंतागुंतीचा ठरत आहे.
 
वाद जागावाटपाचा 
केवळ जागावाटपाच्या ‘ताणाताणी’मुळे युती आणि आघाडीचा संसार मोडला. ही समीकरणं आधीपासून ठरलेली असतानाही या राज्यकत्र्यानी दीड-दोन आठवडे मतदारांची अवस्था ‘त्रिशंकू’प्रमाणो केली. या जागावाटपाच्या तिढय़ाबद्दल तरुणाईच्या मनात रोष असून आता वेगळे झाल्यानंतरही विकासाच्या मुद्दय़ावर न बोलता हे राज्यकर्ते केवळ एकमेकांची उणीदुणी काढतायत, असे तरुणाईचे म्हणणो आहे.
 
नुसतेच ‘आरोप-प्रत्यारोप’
प्रचाराने वेग धरल्यानंतर राज्यभरात प्रचाराचा ‘बोलबाला’ होण्याऐवजी राज्यकत्र्यानी एकमेकावंर घेतलेल्या ‘तोंडसुखा’ची अधिकच चर्चा झाली. मग त्यात ब्ल्यू प्रिंट, व्हिजन डॉक्युमेंट, दृष्टिपत्र, जाहीरनामा या वेगवेगळ्या शब्दांची ‘अदलाबदल’ करत सगळ्यांनीच विकासाचा आराखडा मांडला. मात्र त्यानंतर विकासाच्या मुद्दय़ाला बगल देत केवळ एकमेकांची ‘अब्रू’ दावणीला बांधण्याकडेच या राज्यकत्र्याचा कल दिसून आला. या आरोप-प्रत्यारोपांबद्दल तरुणाईच्या मनात प्रचंड चीड असून यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करणारे राज्यकर्ते असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली.
 
निवडणुकीपूर्वीच गणितं बिघडलेल्या राजकीय पक्षांनी आधीच रंग दाखविले आहेत. त्यामुळे या पंचरंगी लढतीत नेमका कुणावर विश्वास ठेवावा, याबद्दल अजूनही संभ्रम आहेच. पण एकूणच सर्व मुद्दय़ांचा विचार करून तरुण पिढीचा विचार करणा:या उमेदवारालाच मत देणार आहे.
- मुकुलिना कोलते, 
नवमतदार
 
सगळेच पक्ष एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असल्यामुळे गोंधळ वाढला आहे. मात्र यातही सोशल मीडियाच्या जाहिरातींना भुरळून न जाता योग्य पक्ष आणि उमेदवारालाच मत देण्याचा निर्धार केला आहे.
- अक्षया घाडी, 
नवमतदार 
 
राज्यातील पाचही प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे तरुणाई गोंधळली आहे. मात्र हल्ली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईने मतदान करून जबाबदारी बजावली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत योग्य उमेदवारालाच आम्ही मतदान करू.
- अदिश्री सहस्रबुद्धे, 
नवमतदार