शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निरूपयोगी प्रकल्पांवर निधीचा चुराडा

By admin | Updated: June 6, 2017 02:22 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून मार्केट, निर्यात भवन, शीतगृहांची उभारणी केली

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून मार्केट, निर्यात भवन, शीतगृहांची उभारणी केली आहे; परंतु उपलब्ध मालमत्तांचा योग्य वापर केला जात नसल्याने त्या धूळखात पडून आहेत. रोड, प्रवेशद्वार व इतर कामांवर फक्त निधी संपविण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असून आतापर्यंत एकही प्रकल्प वेळेत पूर्ण करता आलेला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मालमत्तांचा योग्य वापर करण्यातही प्रशासनाला अपयश आले असून या उधळपट्टीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. संचालक मंडळ जाऊन दोन वर्षे झाली तरी मुंबई बाजार समितीमधील अनागोंदी कारभार अद्याप थांबलेला नाही. निधीचा वारेमाप वापर करण्याचे प्रकार सुरूच असून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात प्रशासकांना अपयश आले आहे. भाजी, फळ व धान्य मार्केटमध्ये करोडो रुपये खर्च करून भव्य प्रवेशद्वारांचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी सुरू केले आहे. प्रवेशद्वारांची रचना करताना त्यामध्ये आवक व जावक गेटमध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली, सुरक्षा रक्षकांसाठी केबीनचा समावेश केला होता. सर्व आवक- जावक गेट संगणकाने एकमेकांशी जोडले जाणार होते; परंतु अद्याप प्रवेशद्वारांची कामे योग्यपद्धतीने करून घेता आलेली नाहीत. माथाडी भवनसमोर बाजार समितीने कृषी प्लाझाचे बांधकाम केले; पंरतु तेथील दुकाने व कार्यालये अकृषी व्यापाऱ्यांना विकून मोक्याच्या भूखंडांचा दुरुपयोग केला आहे. भाजी मार्केटमधील बिगरगाळाधारकांसाठी स्वतंत्र मार्केटचे बांधकाम केले; परंतु सर्व व्यापारी अद्याप जुन्याच मार्केटमध्ये व्यापार करत असून त्यांच्यासाठी बांधलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. धान्य मार्केटच्या समोरील बाजूला निर्यात भवनसाठी चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे; परंतु तेथील गाळ्यांची विक्री करण्यात अपयश आले आहे. नवीन मार्केट धूळखात पडून असून, त्यामधील बांधकाम खर्चही विक्रीतून निघेल की नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. फळ मार्केटमधील बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी नवीन मार्केटचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी सुरू केले आहे; परंतु ते अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. बांधलेल्या मार्केटमध्ये फळांचा व्यापार होण्याची शक्यताही कमी व्यक्त केली असून फक्त संस्थेचे पैसे खर्च करण्यासाठी भव्य इमारत उभी करण्यात आलेली आहे. कृषी प्लाझाच्या मागील बाजूलाही निर्यात भवनचे बांधकाम सुरू आहे. त्याची रचनाही निर्यात भवनऐवजी शॉपिंग मॉलप्रमाणे करण्यात आलेली असून ते कामही धिम्या गतीने सुरू आहे. फळ मार्केटमधील निर्यात भवन, मध्यवर्ती सुविधागृह, भाजी व मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह, मसाला मार्केटच्या बाजूला असणारे सामाजिक सुविधागृह या इमारतींची देखभाल व योग्य वापर करण्यासही प्रशासनाला अपयश आले आहे असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निधी संपविण्यासाठी कामे शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संस्थेचे उत्पन्न वाढविण्याऐवजी असणारा निधी संपविण्याकडे प्रशासनाचा कल आहे. यापूर्वीही धान्य मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतीच्या समोर संचालकांच्या मागणीवरून विनाकारण भिंत उभारून त्यावर लाखोंचा निधी खर्च करण्यात आला. प्रवेशद्वारांच्या कामांवरही प्रचंड पैसे खर्च करण्यात आले असून निर्यात भवन, कृषी प्लाझा अशी नावे देऊन इमारती उभ्या करण्यात येत असून त्याचा वापर होत नसल्याने फक्त निधी संपविण्यासाठीच कामे केली जात असल्याचा आरोप होत आहे.मोक्याचे भूखंड दुसऱ्यांच्या घशात बाजार समितीने मोक्याचे भूखंड इतरांच्या घशात घालण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी धान्य मार्केटमधील मोक्याची जागा खासगी शिक्षण संस्थेला दिली आहे. वाय विंगमधील पहिल्या मजल्यावरील जागा शिक्षण संस्थेला विकली आहे. माथाडी भवनसमोरील कृषी प्लाझाची अत्यंत मोक्याची जागा इलेक्ट्रिक वस्तू विक्रेत्यांच्या घशात घातली असून त्या मागील बाजूला निर्यात भवनच्या नावाखाली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जात आहे. इमारती होत आहेत धोकादायक एपीएमसी नवीन इमारती बांधण्यावर करोडो रूपये खर्च करत आहेत; परंतु अस्तित्वात असलेल्या इमारतींची योग्य देखभाल केली जात नाही. फळ मार्केटमधील दोन, भाजी, मसाला मार्केटमधील प्रत्येकी एक व मसाला मार्केटच्या बाजूला असलेली सामाजिक सुविधेसाठीच्या इमारतीची दुरवस्था होऊ लागली आहे. देखभालीअभावी या वास्तू धोकादायक ठरत असून त्यांची डागडुजी व रंगरंगोटी करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.