शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

निकृष्ट दर्जाची पावणेतीन कोटींची डाळ जप्त

By admin | Updated: October 25, 2016 02:34 IST

दिवाळीमध्ये मिठाई, लाडू, फरसाण आणि अन्य पदार्थांसाठी चणाडाळीची मागणी वाढते. चणाडाळीचे उत्पादन राज्यात होत नसल्याने परदेशातून आयात केली जाते.

मुंबई : दिवाळीमध्ये मिठाई, लाडू, फरसाण आणि अन्य पदार्थांसाठी चणाडाळीची मागणी वाढते. चणाडाळीचे उत्पादन राज्यात होत नसल्याने परदेशातून आयात केली जाते. गेल्या वर्षी रशियाहून आलेल्या चणाडाळीचा निकृष्ट दर्जाचा माल मुंबई, ठाणे परिसरात आला होता. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासनाला कळताच २२ आॅक्टोबरला ४ ठिकाणी धाडी टाकून तब्बल पावणेतीन कोटी रुपये किमतीची निकृष्ट दर्जाची रशियन चणाडाळ जप्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून न्हावा शेवा बंदरावर पडून असलेली रशियन चणाडाळ दिल्लीच्या एका कंपनीने मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी आणल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानंतर एफडीएने टाकलेल्या धाडीत १९३.७ टन वजनाच्या डाळीचा साठा मे.ए.ए. कोल्डस्टोरेज अ‍ॅण्ड आइस फॅक्टरी प्रा. लि., डी- ३९५ एमआयडीसी, तुर्भे येथे जप्त केला. या डाळीची किंमत १ कोटी ५४ लाख ९९ हजार ८४० रुपये इतकी आहे. या साठ्यात असलेल्या डाळीला कीड लागली होती. सडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या डाळीचे पॅकिंग केले होते. पिशव्यांवर कोड नंबर, लॉट नंबर, मुदतबाह्य दिनांक, वजन याचे लेबल लावलेले नव्हते. पॅकिंगसाठी दिल्लीचा क्रमांक लिहिलेला होता. या ठिकाणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केल्यावर मे. गाला फुड्स प्रा. लि.द्वारा ओम वेअर हाऊस सी - ३४ एमआयडीसी पावणे, नवी मुंबई येथून ४४.६ टन वजनाची डाळ जप्त करण्यात आली. या डाळीची किंमत ४८ लाख २१ हजार ९८४ रुपये इतकी आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी ७ लाख ७९ हजार ८०० किमतीची ७.८ टन वजनाची डाळ जप्त करण्यात आली आहे. शिरवणे परिसरातून ५१.९९ टन डाळ जप्त करण्यात आली आहे. या डाळीची किंंमत ६७ लाख ५९ हजार ७४० रुपये इतकी आहे. (प्रतिनिधी)कुठून आली निकृष्ट दर्जाची चणाडाळ? गेल्या वर्षी नोव्हेंबर २०१५ मध्ये न्हावा शेवा बंदरावर रशियन काबुली चण्याची डाळ इंदौर येथील मे. जवाहरलाल अ‍ॅण्ड सन्सने आयात केली होती. हा साठा आक्षेपार्ह स्थितीत सुमारे वर्षभर बंदरावर पडून होता. वर्षभरानंतर दिवाळी जवळ आल्यावर दिल्लीतील मे. रामस्वरूप रामनिवास अ‍ॅण्ड सन्स यांनी बाजारात विक्रीसाठी आणली.सणासुदीच्या काळात पदार्थांची मागणी वाढत असल्यामुळे भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचा माल बाजारात आणला जातो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्यामुळे चण्याची डाळ, खवा, मावा यांची मागणी वाढते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राज्यभर राबविली आहे. यात प्रत्येक ठिकाणी साहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके विविध भागांत तपासणी करत आहेत. ग्राहकांनी माल खरेदी करताना लक्ष ठेवले पाहिजे. कमी किमतीत माल मिळत असल्यास त्या पदार्थाची मुदत आणि दर्जा तपासला पाहिजे. - डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन