शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या कर्ज खात्यात !

By admin | Updated: July 21, 2016 23:23 IST

कर्जवसुली न करण्याचे आदेश असतानाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित.

विवेक चांदूरकर / बुलडाणाराज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत; मात्र त्यानंतरही कर्ज पुनर्गठन करून नवीन कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना मिळत असलेला पीकविमा हा शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात जमा होत असून, शेतकर्‍यांकडून अनपेक्षितरीत्या वसुलीच करण्यात येत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील शेतकर्‍यांकडून कोणत्याही प्रकारची कर्ज वुसली करू नये असे आदेश दिले आहेत. गत पंधरा दिवसांपासून राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेतकर्‍यांना २0१५ साली काढलेला पीक विमा देण्यात येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले अशा शेतकर्‍यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या कर्जाचे नूतनीकरण केले, अशा शेतकर्‍यांच्या बचत खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात होत आहे. तसेच थकीत कर्ज असलेल्या नवीन कर्ज न मिळालेल्या शेतकर्‍यांच्याही बचत खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन केले व यावर्षी नवीन पीक कर्ज घेतले, अशा शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार येत असून सदर रक्कम शेतकर्‍याला मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज शेतकरी उत्पन्नातून फेडू शकतात. त्यकरिता विम्याचे पैसे वळते करणे चुकीचे असल्याचा आरोप काही शेतकर्‍यांनी केला आहे. ***शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार यावर्षी मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. अन्य सर्व शेतकर्‍यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम टाकण्यात येणार आहे. - सुभाष बोंदाडे व्यवस्थापकीय संचालक, नाबार्ड, बुलडाणा.