शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या कर्ज खात्यात !

By admin | Updated: July 21, 2016 23:23 IST

कर्जवसुली न करण्याचे आदेश असतानाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित.

विवेक चांदूरकर / बुलडाणाराज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत; मात्र त्यानंतरही कर्ज पुनर्गठन करून नवीन कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना मिळत असलेला पीकविमा हा शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात जमा होत असून, शेतकर्‍यांकडून अनपेक्षितरीत्या वसुलीच करण्यात येत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील शेतकर्‍यांकडून कोणत्याही प्रकारची कर्ज वुसली करू नये असे आदेश दिले आहेत. गत पंधरा दिवसांपासून राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेतकर्‍यांना २0१५ साली काढलेला पीक विमा देण्यात येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले अशा शेतकर्‍यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या कर्जाचे नूतनीकरण केले, अशा शेतकर्‍यांच्या बचत खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात होत आहे. तसेच थकीत कर्ज असलेल्या नवीन कर्ज न मिळालेल्या शेतकर्‍यांच्याही बचत खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन केले व यावर्षी नवीन पीक कर्ज घेतले, अशा शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार येत असून सदर रक्कम शेतकर्‍याला मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज शेतकरी उत्पन्नातून फेडू शकतात. त्यकरिता विम्याचे पैसे वळते करणे चुकीचे असल्याचा आरोप काही शेतकर्‍यांनी केला आहे. ***शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार यावर्षी मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. अन्य सर्व शेतकर्‍यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम टाकण्यात येणार आहे. - सुभाष बोंदाडे व्यवस्थापकीय संचालक, नाबार्ड, बुलडाणा.