शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या कर्ज खात्यात !

By admin | Updated: July 21, 2016 23:23 IST

कर्जवसुली न करण्याचे आदेश असतानाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित.

विवेक चांदूरकर / बुलडाणाराज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत; मात्र त्यानंतरही कर्ज पुनर्गठन करून नवीन कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना मिळत असलेला पीकविमा हा शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात जमा होत असून, शेतकर्‍यांकडून अनपेक्षितरीत्या वसुलीच करण्यात येत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील शेतकर्‍यांकडून कोणत्याही प्रकारची कर्ज वुसली करू नये असे आदेश दिले आहेत. गत पंधरा दिवसांपासून राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेतकर्‍यांना २0१५ साली काढलेला पीक विमा देण्यात येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले अशा शेतकर्‍यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या कर्जाचे नूतनीकरण केले, अशा शेतकर्‍यांच्या बचत खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात होत आहे. तसेच थकीत कर्ज असलेल्या नवीन कर्ज न मिळालेल्या शेतकर्‍यांच्याही बचत खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन केले व यावर्षी नवीन पीक कर्ज घेतले, अशा शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार येत असून सदर रक्कम शेतकर्‍याला मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज शेतकरी उत्पन्नातून फेडू शकतात. त्यकरिता विम्याचे पैसे वळते करणे चुकीचे असल्याचा आरोप काही शेतकर्‍यांनी केला आहे. ***शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार यावर्षी मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. अन्य सर्व शेतकर्‍यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम टाकण्यात येणार आहे. - सुभाष बोंदाडे व्यवस्थापकीय संचालक, नाबार्ड, बुलडाणा.