शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाच्या आधाराला पीक विमा

By admin | Updated: April 30, 2016 03:19 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, राष्ट्रीय जमीन पत्रिका अभियान, मनरेगा अशा योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सचे प्रकाशन केले होते.

पालघर/नंडोरे : पालघर जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत अलीकडेच पालकमंत्र्यांच्याहस्ते मृद आरोग्य पत्रिका, ग्रामोदय से भारत उदय, पंतप्रधान पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, राष्ट्रीय जमीन पत्रिका अभियान, मनरेगा अशा योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सचे प्रकाशन केले होते. ठाणे व पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या कृषी योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने नंतर पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार सिद्ध होणार आहे.या विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे झालेल्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. विमा सुरक्षा रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजुर कर्ज मर्यादेइतकी राहणार असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हक्क दर खरीप हंगामासाठी २ टक्के रब्बी हंगामासाठी १.५० टक्के तर नगदी पिकासाठी ५ टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे.शेतकऱ्यांना या योजनेत पिक व पेरणी केल्यापासून पिक काढणीपर्यंतच्या वेळेत किंवा कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घट मध्येही लाभ मिळणार आहे. तसेच नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रिवादळ, पुर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी सारखे शेतकऱ्यांना टाळता न येण्यासारख्या कारणांमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठीही पीक विमा योजनेचे संरक्षण मिळणार आहे. अपुरा पाऊस तसेच हवामानाच्या इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसुचीत केलेल्या मुख्य पिकांची ठरवलेल्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात पेरणी/लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी (पेरणी/लावणी नसलेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त) एकूण विमा संरक्षणाच्या रक्कमेपैकी २५ टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)>कृषी विभागाचे आवाहनजिल्ह्यात खरीप हंगामासाठी ३१ जुलै २०१६ व रब्बी हंगामासाठी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले असून या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त लक्षांक शेतकऱ्यांना समाविष्ठ करण्याचा व पिक विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा कृषी विभाग करीत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रकल्प संचालक (आत्मा) ठाणे व जिल्हा कृषी अधिक्षक पालघर यांनी केले आहे.४८ तासांत माहिती देणे राहणार बंधनकारकचक्रिवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर या पिकांचे पंचनामे करूनच नुकसान भरपाई निश्चित केली जाईल व हे नुकसान झाल्यानंतर किमान १४ दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील. या योजनेअंतर्गत पुराचे पाणी शेतात शिरून झालेले नुकसान, भुस्खलन किंवा गारपीट अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीत ही नुकसान भरपाई वैयक्तीक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येतील. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी किंवा पीक वीमा योजना काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई झाल्यापासून ४८ तासाच्या आत नुकसानग्रस्त अधिसुचीत पिकांची माहिती, नुकसान झाल्याचे कारण व नुकसान झालेले प्रमाण संबंधित विमा कंपनीत कळविणे आवश्यक आहे.