शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिकांमध्ये वाढला ९५ टक्के तणनाशकांचा वापर!

By admin | Updated: July 6, 2016 01:19 IST

शास्त्रोक्त पद्धतीअभावी नुकसान; पंदेकृवि देणार तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण.

अकोला : किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणामुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्‍यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे; जवळपास ८0 टक्केच्यावर शेतकरी पिकात तणनाशकांचा वापर करतात. परंतु, तणनाशकाची नेमकी मात्रा न वापरल्याने शेतकर्‍यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरुवातीला गव्हाच्या पिकासह इतर पिकावर तणनाशक वापरण्यासंबंधी कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याची शिफारस राज्यस्तरीय संशोधन सल्लागार आढावा समिती (जॉइंट अँग्रोस्को) कडे केली होती. ती शिफारस मान्य झाली असून, आता इतर पिकांवरील तणनाशक वापरासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या अगोदरच महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या या शिफारशींना संयुक्त संशोधन आढावा परिषदेची मान्यताही मिळाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर गहू पिकासाठी तणनाशकांचा योग्य वापर करण्यासाठी मान्यता मिळाली असून, शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पश्‍चिम विदर्भात तणनाशकांचा वापर अधिक या विद्यापीठाने गतवर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता तालुके व गावं निवडण्यात आली होती. तणनाशक वापरासंबंधी असलेले ज्ञान, त्याचा अवलंब आदींबाबत या शेतकर्‍यांकडून माहिती घेण्यात आली. सोयाबीनबाबत शिफारस केली असली, तरी गहू या पिकात शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहेत; पण त्याचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याने ५0 टक्केच्या जवळपास नुकसान होत आहे.