शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

पिकांमध्ये वाढला ९५ टक्के तणनाशकांचा वापर!

By admin | Updated: July 6, 2016 01:19 IST

शास्त्रोक्त पद्धतीअभावी नुकसान; पंदेकृवि देणार तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण.

अकोला : किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणामुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्‍यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे; जवळपास ८0 टक्केच्यावर शेतकरी पिकात तणनाशकांचा वापर करतात. परंतु, तणनाशकाची नेमकी मात्रा न वापरल्याने शेतकर्‍यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरुवातीला गव्हाच्या पिकासह इतर पिकावर तणनाशक वापरण्यासंबंधी कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याची शिफारस राज्यस्तरीय संशोधन सल्लागार आढावा समिती (जॉइंट अँग्रोस्को) कडे केली होती. ती शिफारस मान्य झाली असून, आता इतर पिकांवरील तणनाशक वापरासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या अगोदरच महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या या शिफारशींना संयुक्त संशोधन आढावा परिषदेची मान्यताही मिळाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर गहू पिकासाठी तणनाशकांचा योग्य वापर करण्यासाठी मान्यता मिळाली असून, शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पश्‍चिम विदर्भात तणनाशकांचा वापर अधिक या विद्यापीठाने गतवर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता तालुके व गावं निवडण्यात आली होती. तणनाशक वापरासंबंधी असलेले ज्ञान, त्याचा अवलंब आदींबाबत या शेतकर्‍यांकडून माहिती घेण्यात आली. सोयाबीनबाबत शिफारस केली असली, तरी गहू या पिकात शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहेत; पण त्याचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याने ५0 टक्केच्या जवळपास नुकसान होत आहे.