शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

स्तुती करणारेच बनले टीकाकार

By admin | Updated: October 5, 2014 02:37 IST

ज्यांनी पाच महिन्यांपूर्वी माझी स्तुती केली, तेच आज मला शिव्याशाप देण्याकरिता स्पर्धा करीत आहेत. ज्यांची माङयासोबत मंचावर बसण्याची इच्छा नाही त्यांच्याबरोबर सरकार कसे चालवावे.

नरेंद्र मोदींचा शिवसेनेवर हल्ला : शिवराय ही कोणाची प्रॉपर्टी नाही -फडणवीस
बीड, औरंगाबाद अन् मुंबईत मोदींच्या भरगच्च सभा
मुंबई : ज्यांनी पाच महिन्यांपूर्वी माझी स्तुती केली, तेच आज मला शिव्याशाप देण्याकरिता स्पर्धा करीत आहेत. ज्यांची माङयासोबत मंचावर बसण्याची इच्छा नाही त्यांच्याबरोबर सरकार कसे चालवावे. मला पाहून ते दरवाजा बंद करतील, अशा शब्दांत नाव न घेता शिवसेनेला टोले लगावत  विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
बीड, औरंगाबाद व महालक्ष्मी येथील जाहीर सभांनी मोदींच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला प्रारंभ झाला. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरची सहानुभूतीची लाट मतांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. औरंगाबादेत पर्यटनाच्या क्षमतेचा त्यांनी हेतूत: उल्लेख केला, तर दोन्ही सभांत शिवसेनेबाबत मौन पाळणा:या मोदींनी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील सभेत सेनेला टोले लगावले. 2022 मध्ये कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही. प्रत्येकाला पक्के घर, वीज, पाणी याची सोय केलेली असेल. नवी मुंबई विमानतळ, सी लिंक, मेट्रो हे प्रकल्प पूर्ण करू, असा दावा त्यांनी केला.
 
शिवजयंतीला हप्ते गोळा करणो अयोग्य
छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची मक्तेदारी नाही, असे सांगत शिवजयंतीच्या निमित्ताने हप्ते कोण गोळा करतात, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा नामोल्लेख न करता केला.
 
महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे नेऊन ठेवेन
महाराष्ट्रात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर दिल्लीत बसून आपण महाराष्ट्राची सेवा करू. आपल्याकडे पाहून मतदान करा. राज्यात भाजपाचे सरकार आल्यास महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे नेऊन ठेवेन.                 - नरेंद्र मोदी
 
राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचारवादी
बीड - गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर आपण महाराष्ट्रात प्रचाराकरिता आलो नसतो. आपल्याला ते लहान भावासारखे होते. त्यांची कमतरता आपल्याला जाणवू देणार नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी मुंडे यांच्या मृत्यूचे भावनिक राजकारण येथे केले.
 
राज्यात घडय़ाळ आणि हाताचे संगनमत झाले असून त्यांनी वेळेपूर्वीच तिजोरी साफ केली आहे, असा आरोप मोदी यांनी केला. महाराष्ट्र वाचला नाही तर देश वाचणार नाही. दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्य़ा दिसत असल्या तरी त्यांचे गोत्र एक आहे. व्यक्तिगत कारणास्तव त्यांनी दोन दुकाने उघडली आहेत; परंतु त्यांचे चरित्र, सवयी, हेतू एक आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेस नसून भ्रष्टाचारवादी काँग्रेस आहे.
 
औरंगाबाद - देशाला रोजीरोटी मिळवून देण्याचे काम केलेला महाराष्ट्र मागे राहिला. दिल्लीत मोदी सरकार यशस्वी व्हायचे असेल तर महाराष्ट्रात प्रगती होणो गरजेचे आहे, असे मत मोदी यांनी येथे व्यक्त केले. औरंगाबादचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असून, शहर स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.