शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

४० वर्षे खाल्ल्या खस्ता, ५० लाखांची पदरमोड !

By admin | Updated: August 31, 2015 01:12 IST

स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवत एका रस्त्यासाठी डोंगर फोडण्यात आयुष्य खर्ची घालणाऱ्या बिहारमधील ‘माउंटन मॅन’ अर्थात दशरथ मांझी यांची देशभरात चर्चा होत असताना महाराष्ट्रातही

योगेश गुंड, अहमदनगरस्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवत एका रस्त्यासाठी डोंगर फोडण्यात आयुष्य खर्ची घालणाऱ्या बिहारमधील ‘माउंटन मॅन’ अर्थात दशरथ मांझी यांची देशभरात चर्चा होत असताना महाराष्ट्रातही एका रस्त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राजाराम भापकर गुरुजींनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. आज सारा महाराष्ट्र त्यांना ‘रस्तेवाले गुरुजी’ म्हणून ओळखतो.ज्या रस्त्याच्या कामासाठी गुरुजींनी ४० वर्षे खस्ता खाल्ल्या त्याच रस्त्याच्या कामावर त्यांनी आपलं निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम खर्च करून ‘मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा महत्त्वाच्या असतात’ हे दाखवून दिलं. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांनी हे तत्त्व जीवापाड जपलं आहे. गुरुजींचं गाव गुंडेगाव (ता. नगर, जि. अहमदनगर). गुंडेगावला नगरपेक्षा श्रीगोंद्यातील कोळगाव जवळचे. बाजार, दवाखाना तसेच इतर कामासाठी गुंडेगावच्या लोकांना पायवाटेनं कोळगावला जावं लागे. पण रस्त्यात मोठ्या डोंगराचा अडसर. रुग्णांना, बाळंतिणीला अक्षरश: झोळीत टाकून न्यावं लागे. गुरुजींची आई ही कोळगावला बाजारात जायची. आईच्या पायात रूतलेला काटा आणि रक्तबंबाळ झालेला पाय पाहून गुरुजींच्या मनावर खोलवर जखम झाली. मग गुंडेगाव ते नगर रस्त्यासाठी त्यांनी लढाई सुरू केली. कधी पत्रव्यवहार तर कधी भेटी. परंतु यश मिळेना. सरकार जिथं कमी पडतं, तिथं ध्येयवेड्या माणसाचं काम सुरू होतं. १९५७-५८ मध्ये त्यांनी एक अवघड दगड दूर करून घाट रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.भापकर गुरुजी तेव्हा एकटेच झटायचे. प्राथमिक शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी झोकून दिले. पगारातील अर्धी रक्कम ते रस्त्याच्या कामावरच खर्च करीत. एकाकी खिंड लढवणाऱ्या गुरुजींच्या मदतीला काही तरुण सहकारी तयार झाले. त्यांनी श्रमदान करणाऱ्या तरुणांना मजुरी द्यायला सुरुवात केली. निवृत्तीनंतर त्यांनी निवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम रस्त्याच्या कामावर खर्च केली आणि ४० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर गुंडेगाव ते खंडोबा मंदिर हा पाच किलोमीटरचा घाटरस्ता तयार झाला. ५० लाखांची पदरमोड !संतोषा डोंगराच्या दुसऱ्या बाजूला धावडेवाडी आहे. हा पाच किलोमीटरचा रस्ता सहकाऱ्यांच्या मदतीनं गुरुजींनी दोन वर्षांत पूर्ण केला. त्यानंतर आणखी पाच रस्ते गुरुजींच्या प्रयत्नांनी साकारले. कधी धान्य रूपाने मदत, तर कधी आर्थिक मदत अशी गुरुजींनी ५० लाख रुपये पदरमोड केली आहे.कधी निसर्गाचं रक्षण करणारा तर कधी आपल्या आचरणातून समाजकारणाचे धडे देणारा हा ध्येयवेडा ८५ वर्षांचा तरुण ‘आपण समाजासाठी खूप काही केले’ असं आजही मानत नाही. ‘मी ज्या रस्त्यांसाठी झिजलो, ते अद्याप शासनाच्या नियोजनात नाहीत. त्यामुळे या रस्त्यांना शासन दरबारी अजूनही अनधिकृतच ठरवले जाते.’ अशी खंत भापकर गुरुजी व्यक्त करतात.