शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

मराठवाडयातील पिके संकटात

By admin | Updated: October 4, 2016 05:29 IST

सातत्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असली तरी, अतिवृष्टीमुळे तब्बल १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकावर पाणी पडले आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबई सातत्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असली तरी, अतिवृष्टीमुळे तब्बल १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकावर पाणी पडले आहे. या ‘ओल्या’ संकटामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले आहे.औरंगाबाद येथे ४ आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा प्राथमिक अहवाल मागवला गेला. त्यातून ही आकडेवारी समोर आली असून मंत्रीमंडळ बैठकीत यावर कोणता निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर केल्याने काढणीस आलेली सोयाबिन, तूर, कापूस आदी पिके पाण्यात गेली आहेत. सोयाबिनच्या शेंगा जागेवरच फुटत असून तूर पिवळी पडली आहे, असे कृषी विभागाने सरकारला कळवले आहे.परतीच्या पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन, उडीद, बाजरी, तूर, कांदा, ज्वारी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येत्या दोन दिवसात या भागात आणखी पाऊस होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे पाऊस थांबल्यावर केले जातील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. जर पंचनामे नंतर होणार असतील आणि नुकसानीची स्पष्टता येणार नसेल तर मंत्रिमंडळ बैठकीत कशाच्या आधारावर निर्णय घेतले जातील, असा सवाल केला जात आहे.

अशी झाली पिकाची हाणी

जिल्हा   क्षेत्र/हेक्टर    बाधित पिकेऔरंगाबाद५४२०कापूस, मका, सोयाबिनजालना४४९४कापूस, सोयाबिन, उडीदबीड४,६९,३११बाजरी, सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, ज्वारीलातूर५,०५,३४०बाजरी, सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, ज्वारीउस्मानाबाद२,९४,६७६सोयाबिन, तूर, ज्वारी, बाजरी, भात, मका,भूईमूग, सूर्यफूल, तीळ, कापूसनांदेड१,५१,६१७सोयाबिन, कापूस, ज्वारी, हळद, तूरपरभणी५८,५३८सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, भाजीपालाहिंगोली१४९सोयाबिन व हळद