शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१९ गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: August 26, 2016 02:51 IST

अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांच्यासह १९ गोविंदा पथकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यातगुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांच्यासह १९ गोविंदा पथकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यातगुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील भगवती शाळेजवळील मैदानात ९ थर लावणाऱ्यांना ११ लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. सकाळी ११ ते दुपारी २.३० च्या दरम्यान या हंडीच्या ठिकाणी गोविंदा पथकांमधील १८ वर्षांखालील मुलांना सहभागी केले. तसेच दहीहंडी फोडण्याकरिता लावण्यात आलेल्या थरांची उंची २० फुटांपेक्षा जास्त असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे नोटीसनुसार उत्सवाचे आयोजक जाधव आणि पानसे यांच्यासह १९ गोविंदा पथकांविरोधात भा.दं.वि.स. कलम ३०८, ३३६, १८८, ३४ नुसारगुन्हे दाखल झाले आहे. >गुन्हे दाखल झालेल्या गोविंदा पथकांची नावे जागृत हनुमान चौक, जोगेश्वरी (७ थर), किसननगरचा राजा, ठाणे (७ थर), आई जीवदानी पथक, विरार (८ थर), नवतरुण मित्र मंडळ, ठाणे (६ थर व १८ वर्षांखालील गोविंदा), ओमसाई मित्र मंडळ, शांतीनगर (७थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा), म्हाडा गोविंदा पथक (७ थर), एकता मित्र मंडळ (६ थर), वीर संभाजी मंडळ (६ थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा), श्रीसाई दहीकाला उत्सव मंडळ, ठाणे (६ थर), नवतरुण मित्र मंडळ (६ थर (दोन वेळा), बेस्टचा राजा मुंबई (६ थर), बालवीर मंडळ (६ थर), बाळाराम स्मृती ( ६ थर), शिवशाही मित्र मंडळ (७थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा), शिवसाई मित्र मंडळ (९ थर, दोन वेळा), जय जवान मित्र मंडळ (९ थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा)>‘‘या ठिकाणी दुपारपर्यंत व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे केलेल्या चित्रीकरणात २३ गोविंदा पथकांचे चित्रीकरण झाले होते. १६ पथकांसह आयोजकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पाच पथकांनी लहान मुलांचा वापर केल्याचे समोर आले. तसेच तपासाअंती पथकांना उंचचउंच थर लावण्याकरिता प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो.’’- भरत शेळके, सहायक पोलीस आयुक्त >ठाणे, मुंब्रा येथे ४ जण जखमी ठाणे व मुंब्रा येथे दहीहंडीत सहभागी झालेले दोन गोविंदा तसेच दोन बघे जखमी झाले. मनीषानगर, कळवा येथील गोविंदा पथकातील भूषण नेरकर (३८) यांच्या डोक्याला जखम झाली आहे, तर खारटन रोड येथे दहीहंडी पाहत असताना प्रशांत भोईर (२०) यांच्या डोक्यात हंडीचा काही भाग पडून ते जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंब्रा, आनंदनगर कोळीवाडा येथे मिथिलेश मिश्रा (११) हा दहीहंडी पाहत असताना डोक्यात नारळ पडून जखमी झाला, तर मुंब्रा मार्केटमध्ये एक गोविंदा जखमी झाला.>खड्ड्यात पडून गोविंदा जखमीडोंबिवली : गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडीचे उंचउंच थर लावताना गोविंदा पडून जखमी होतात. मात्र, गुरुवारी सकाळी गौरव राजभर (१७, रा. डोंबिवली) या गोविंदाची दुचाकी आजदेगाव येथील खड्ड्यात आदळल्याने तो खाली पडला. त्यात त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला मित्रांनी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला बॅण्डेज करू न अधिक उपचारासाठी सायन रु ग्णालयात हलवण्यात आले.राजभर दुचाकीवरून हंडी फोडण्यासाठी डोंबिवलीत फिरत होता. त्या वेळी आजदेगाव येथे ही घटना घडली. त्यामुळे त्याच्या गोविंदा पथकाने महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दिवसभरात आणखी दोन गोविंदा जखमी झाले. कल्याणमधील निशांत पाटील याच्या हाताला दुखापत झाली. त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तर डोंबिवलीत समाधान सोनावणे याच्या हाता-पायाला लागल्याने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.दरम्यान, याअगोदर खड्ड्यात पडून डोंबिवलीत दोन महिला आणि एक ज्येष्ठ नागरिक जबर जखमी झाले होते. कल्याण-मलंग रस्त्यावर द्वारली गावाजवळ खड्ड्यामुळे एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांचे नेते आता तरी खड्ड्यांकडे लक्ष देतील का, असा असा सवाल नागरिक करत आहेत.