शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

क्राइम ब्रँच, परिमंडळ मिळविण्यासाठी चढाओढ

By admin | Updated: April 30, 2017 03:18 IST

पोलीस दलातील बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांची दहावर पदे रिक्त झाली असून त्या जागी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई : पोलीस दलातील बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांची दहावर पदे रिक्त झाली असून त्या जागी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. क्राइम बँ्रच व महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या परिमंडळाच्या जागी नियुक्ती मिळावी म्हणून अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यासाठी इच्छुकांकडून मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बदली व बढती झालेल्या अधिकाऱ्यांना १ मे रोजीच्या परेडनंतर नव्या नियुक्तीच्या ठिकाणासाठी सध्याच्या ठिकाणाहून कार्यमुक्त केले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्य सरकारने गुरुवारी मध्यरात्री जारी केलेल्या बदल्या व बढत्यांमध्ये मुंबईतील चार उपायुक्तांना अप्पर आयुक्त/ उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्याशिवाय सहा उपायुक्तांच्या आयुक्तालयाबाहेर बदल्या झाल्या आहेत. यात गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन, आर्थिक गुन्हे अन्वेषण वाहतूक नियंत्रण शाखेतील एक पद, तर ३, ९, व १२ या परिमंडळाची पदे रिक्त झाली आहेत. मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडून येत्या आठवड्याभरात टप्प्याटप्प्याने त्यांची नियुक्ती होईल. आवश्यकतेनुसार सध्या कार्यरत काही उपायुक्तांचे परिमंडळ, शाखा बदलली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती व्हावी, यासाठी काहींनी वरिष्ठ मंत्री, सत्ताधारी राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत व गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ‘फिल्डिंग’ लावल्याचे समजते. (प्रतिनिधी)‘फोर्सवन’चे पठाण मुंबईत मुंबईत बदलून आलेल्या उपायुक्तांमध्ये ‘फोर्सवन’चे पोलीस अधीक्षक अकबर पठाण यांचा समावेश असून चार वर्षांपासून ते त्या ठिकाणी कार्यरत होते. पठाण हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून २००७च्या उपअधीक्षक बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी परभणी व वाशिम या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. ते ‘फोर्सवन’मध्ये २०१३ पासून कार्यरत आहेत.