शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 01:23 IST

मृतदेह रुग्णालयात नेऊन कायदेशीर बाब पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आणि स्वत: त्याला अग्नीही दिला.

समीर कर्णुक,

मुंबई- तब्बल चार तास रिक्षात बेवारस पडलेल्या वृद्धाच्या मृतदेहाला कोणी हात लावायला तयार नसताना एका तरुणाने पुढाकार घेऊन मृतदेह रुग्णालयात नेऊन कायदेशीर बाब पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आणि स्वत: त्याला अग्नीही दिला. चेंबूरच्या घाटला गावात राहणाऱ्या राजेंद्र नगराळे या तरुणाच्या कार्यामुळे आजही समाजात माणुसकी शिल्लक असल्याचे दिसून आले. हरेश साटम (६०) असे वृद्धाचे नाव असून ते चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात पत्नी आणि आईसोबत राहायचे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना आणि त्यांच्या आई प्रभावती (८५) या दोघांना घराबाहेर काढले. काहीही कामधंदा नसल्याने दोघे मायलेक चेंबूर परिसरात भीक मागून दिवस काढत होते. त्यानंतर मिळेल त्या जागी ते झोपत असत. गेल्या काही दिवसांपासून ते घाटला गाव परिसरातील सावळी नाका येथील फुटपाथवर राहत होते. या ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षात पावसामुळे ते आश्रय घ्यायचे. गेल्या तीन-चार दिवसांपासून हरेश यांची प्रकृती बिघडली होती. पैसेदेखील नसल्याने ते रुग्णालयातही जाऊ शकत नव्हते. त्यातच त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या आईने आरडाओरडा केल्यानं परिसरातील रहिवासी जमा झाले; मात्र कोणीही मदत करायला तयार नव्हते. सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत मृतदेह रिक्षामध्ये पडून होता. ही घटना घाटला गाव परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र नगराळे यांना कळताच त्यांनी हा मृतदेह रिक्षातून गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेला. तेथे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मृतदेहावर देवनार स्मशानभूमीत स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले.