शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

महाराष्ट्रातून ४ स्वतंत्र राज्ये निर्माण करा - मा.गो.वैद्य

By admin | Updated: January 14, 2017 20:29 IST

आपल्या देशात राज्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. त्यामुळेच ३ कोटींच्या लोकसंख्येप्रमाणे राज्यांची निर्मिती करायला हवी.

ऑनलाइन लोकमत  
नागपूर, दि. 14 -  आपल्या देशात राज्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. त्यामुळेच ३ कोटींच्या लोकसंख्येप्रमाणे राज्यांची निर्मिती करायला हवी. यामुळे सुलभ राज्यप्रशासन होऊ शकते. या हिशेबाने महाराष्ट्रातून विदर्भासह ४ स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले. 
 
विदर्भ राज्य निर्मितीसाठी लढणा-या सर्व विदर्भवादी संघटनांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाची सुरुवात करण्यात आली आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने परत जोर धरला आहे. मुळात चांगला व सुरळीत राज्यकारभार चालावा यासाठी लहान राज्यांची आवश्यकता असते. 
 
आपल्या देशात उत्तरप्रदेशची लोकसंख्या २० कोटींच्या जवळ आहे तर दुसरीकडे सिक्कीम राज्याची लोकसंख्या ६ लाख १० हजार आहे. त्यामुळे देशात समान लोकसंख्येच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. यासाठी केंद्राने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली पाहिजे, असे मा.गो.वैद्य म्हणाले.देशात छत्तीसगड वगळता सर्व लहान राज्यांच्या निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला. मुळात राज्यांची निर्मिती ही आंदोलनाशिवायच झाली पाहिजे, असेदेखील वैद्य म्हणाले.