शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

साहित्य संमेलन वादावर आता पडदा टाका !

By admin | Updated: January 14, 2016 02:31 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता

मुंबई/पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता, परंतु त्यांनी आता माफी मागितली असल्याने सर्व वादावर पडदा टाका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. साहित्य संमेलनाला मी जाणार नाही, असे कधीही म्हटलेले नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला जाणार असल्याचे संकेत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिले. तर पुण्यात भाजपाचे खा. अमर साबळे यांनीही वादावर पडदा टाकल्याचे सांगितले. इतर साहित्यिकांबरोबर सबनीस यांचेही स्वागत करू, असे साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यापुढे भाषणातून वादग्रस्त विधान येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, की साहित्य संमेलनाच्या आयोजनाला आमचा कधीच विरोध नव्हता. सबनीस यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला आमचा आक्षेप होता. त्यांनी स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंतप्रधानांबाबत असे विधान केले. (विशेष प्रतिनिधी) महामंडळाच्या कारभाराविरोधात तक्रारकाही साहित्यिकांनी एकत्र येत महामंडळाच्या कारभाराविरोधात विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद अडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. मुरलीधर साठे, अनिल कुलकर्णी आणि अशोक मुळे यांनी ही तक्रार केली असून, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, महेश केळुस्कर, सुहास सोनावणे, अरुण म्हात्रे, भारत सासने, राजन खान, अ‍ॅड. सतीश गोराडे, मुकुंद आवटे अशा साहित्यिकांनी तक्रारीस पाठिंबा दिला आहे.संमेलनात आपण स्वत: उपस्थित राहू. अगदी सबनीसांचेही स्वागत आम्ही करू. हे संमेलन दिमाखात पार पाडण्यासाठी भाजपा व सरकार म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार आहे. - खा, अमर साबळे, भाजपा