शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

साहित्य संमेलन वादावर आता पडदा टाका !

By admin | Updated: January 14, 2016 02:31 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता

मुंबई/पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता, परंतु त्यांनी आता माफी मागितली असल्याने सर्व वादावर पडदा टाका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. साहित्य संमेलनाला मी जाणार नाही, असे कधीही म्हटलेले नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला जाणार असल्याचे संकेत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिले. तर पुण्यात भाजपाचे खा. अमर साबळे यांनीही वादावर पडदा टाकल्याचे सांगितले. इतर साहित्यिकांबरोबर सबनीस यांचेही स्वागत करू, असे साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यापुढे भाषणातून वादग्रस्त विधान येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, की साहित्य संमेलनाच्या आयोजनाला आमचा कधीच विरोध नव्हता. सबनीस यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला आमचा आक्षेप होता. त्यांनी स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंतप्रधानांबाबत असे विधान केले. (विशेष प्रतिनिधी) महामंडळाच्या कारभाराविरोधात तक्रारकाही साहित्यिकांनी एकत्र येत महामंडळाच्या कारभाराविरोधात विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद अडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. मुरलीधर साठे, अनिल कुलकर्णी आणि अशोक मुळे यांनी ही तक्रार केली असून, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, महेश केळुस्कर, सुहास सोनावणे, अरुण म्हात्रे, भारत सासने, राजन खान, अ‍ॅड. सतीश गोराडे, मुकुंद आवटे अशा साहित्यिकांनी तक्रारीस पाठिंबा दिला आहे.संमेलनात आपण स्वत: उपस्थित राहू. अगदी सबनीसांचेही स्वागत आम्ही करू. हे संमेलन दिमाखात पार पाडण्यासाठी भाजपा व सरकार म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार आहे. - खा, अमर साबळे, भाजपा