शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

दिघावासिय होणार बेघर, बांधकाम नियमित करायला कोर्टाचा नकार

By admin | Updated: March 24, 2017 13:59 IST

अवैध बांधकामांसंबंधी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 24 - अवैध बांधकामांसंबंधी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. बेकायदा बांधकाम नियमित करण्याचे राज्य सरकारचे धोरण मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे दिघ्यातील नागरीकांवरील अनिश्चिततेची टांगती तलवार कायम आहे.  
 
दिघ्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करायला उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लोकांना सदनिक खरेदी करताना या इमारती बेकायदा आहे हे  माहित होते.  त्यामुळे राज्य सरकारचे हे धोरण अयोग्य आहे. सरकारने एवढया मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम नियमित करताना विचार करावा असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
दिघ्यात मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली असून यामध्ये अनेक इमारती आहेत.  कोर्टाने ही सर्व बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. आधीच काही इमारती पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरीक बेघर झाले आहेत. अजूनही अनेक अनधिकृत इमारती असून त्यामध्ये राहणा-या लाखो नागरीकांचा प्रश्न आहे.