शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

देश नेमकं कोर्ट चालवतय की सरकार ? - राज ठाकरे

By admin | Updated: May 16, 2016 13:34 IST

'नीट’ परिक्षेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडत 'नीट’ परिक्षेसंबंधीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत  - 
मुंबई, दि. 16 - 'नीट’ परिक्षेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राज ठाकरे यांच्यासोबत विद्यार्थी आणि पालकदेखील उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडत 'नीट’ परिक्षेसंबंधीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी केली आहे. 
 
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश केंद्र सरकार सोयीने बदलत असल्याची टीका केली आहे. तसंच देश सरकार चालवत आहे की कोर्ट ? असा सवालही विचारला. एकीकडे शेतकरी आत्महत्या सुरु आहेतच.उद्या जर नैराश्यातून विद्यार्थ्यांनी वेडंवाकडं पाऊल उचललं तर जबाबदार कोण? असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे.  
 
मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधानांसोबत बैठकीची वेळ मिळणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी दुष्काळाच्या मुद्यावरदेखील चर्चा केली. टँकरने होणारा पाणीपुरवठा सरकारने हाती घ्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
 
राज ठाकरेंची मोदींशी चर्चा - 
'नीट' प्रश्नावर राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. तब्बल 4 ते 5 मिनीट चर्चा करण्यात आली. यावेळी मोदींनी राज ठाकरेंना लवकरात लवकर तिढा सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे.
 
विनोद तावडे जे पी नड्डांच्या भेटीला -
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नीट परिक्षेच्या मुद्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. जे पी नड्डा यांनी नीट बाबत सर्वपक्षीय चर्चा करु, राज्यांचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडू असं आश्वासन दिलं आहे. तर विनोद तावडे यांनी नीट परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, प्रादेशिक भाषा यावरून अगोदर कोर्टाकडे विनंती केली जाईल असं सांगितलं आहे. नितेश राणे झोपले होते ते आत्ता जागे झाले आहेत, राज ठाकरे यांच्याकडे पालक गेल्यानंतर ते प्रयत्न करत आहेत, स्वतःहून आगोदर लक्ष्य घातले नाही, महाराष्ट्राचे दुर्देव आहे की यावरूनही राजकारण केले जाते अशी टीका तावडेंनी केली आहे.