शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

देश कोणाची खासगी मालमत्ता नाही!

By admin | Updated: November 26, 2015 03:03 IST

आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमीर खानने केलेले असहिष्णुतेचे वक्तव्य हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.

कऱ्हाड : आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमीर खानने केलेले असहिष्णुतेचे वक्तव्य हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. काही जण त्याला चुकीच्या पद्धतीने विरोध करून त्याने मांडलेल्या विचाराला बळकटी देत आहेत. चुकीच्या पद्धतीने विरोध हीच खरी असहिष्णुता आहे. त्याला देश सोडायला काही जण सांगतात; परंतु हा देश म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही, अशा भाषेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबंधितांना फटकारले.येथील वेणुताई चव्हाण स्मारकात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाने आमीरला खूप मोठी प्रसिद्धी व पैसा दिला, असे टीकाकार म्हणत असले तरी, त्याने ते आपल्या कलेतून मिळविलेले आहे. त्याला कुणी देणगी दिलेली नाही, असे सांगून पवार म्हणाले, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारने तयारी केली आहे. त्यामुळे संसदेत याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा वाटते. सध्याचे केंद्र शासन लोकांचे प्रश्न सोडविताना दिसत नाही. जे काही ऐकायला मिळते ते देशाबाहेर, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.कृषिमंत्री एकनाथ खडसे म्हणतात त्याप्रमाणे भरघोस मदत मिळाली तर त्यांचे कौतुकच करावे लागेल. आज साखरेचे भाव पाहता एफआरपी देण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपयांचा फरक पडतो, त्यामुळे शासनाच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देणे कारखानदारांना अवघड पडेल, असेहीे पवारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सचिवांना दोष कशाला ? अनेक वर्षे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहोत. मात्र अधिकारी ऐकत नाही, असा अनुभव आजवर कधीही आला नाही. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत, हे वक्तव्य विचार करायला लावणारे असून, अनेक बाबींना जर मंत्री जबाबदार असतील तर सचिवांना दोष देण्यात काय अर्थ, असेही त्यांनी सांगितले. ‘मध्यावधी निवडणुकी’चे आश्चर्य वाटायला नको ! : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. जनता सध्या परिवर्तनाच्या भूमिकेत असून निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस-राष्ट्रवादीच योग्य पर्याय देऊ शकतो. मात्र, काँग्रेसबरोबर याबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, त्यांच्याकडून असा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देऊ, असेही पवार म्हणाले.