शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

देश कोणाची खासगी मालमत्ता नाही!

By admin | Updated: November 26, 2015 03:03 IST

आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमीर खानने केलेले असहिष्णुतेचे वक्तव्य हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.

कऱ्हाड : आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमीर खानने केलेले असहिष्णुतेचे वक्तव्य हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. काही जण त्याला चुकीच्या पद्धतीने विरोध करून त्याने मांडलेल्या विचाराला बळकटी देत आहेत. चुकीच्या पद्धतीने विरोध हीच खरी असहिष्णुता आहे. त्याला देश सोडायला काही जण सांगतात; परंतु हा देश म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही, अशा भाषेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबंधितांना फटकारले.येथील वेणुताई चव्हाण स्मारकात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाने आमीरला खूप मोठी प्रसिद्धी व पैसा दिला, असे टीकाकार म्हणत असले तरी, त्याने ते आपल्या कलेतून मिळविलेले आहे. त्याला कुणी देणगी दिलेली नाही, असे सांगून पवार म्हणाले, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारने तयारी केली आहे. त्यामुळे संसदेत याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा वाटते. सध्याचे केंद्र शासन लोकांचे प्रश्न सोडविताना दिसत नाही. जे काही ऐकायला मिळते ते देशाबाहेर, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.कृषिमंत्री एकनाथ खडसे म्हणतात त्याप्रमाणे भरघोस मदत मिळाली तर त्यांचे कौतुकच करावे लागेल. आज साखरेचे भाव पाहता एफआरपी देण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपयांचा फरक पडतो, त्यामुळे शासनाच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देणे कारखानदारांना अवघड पडेल, असेहीे पवारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सचिवांना दोष कशाला ? अनेक वर्षे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहोत. मात्र अधिकारी ऐकत नाही, असा अनुभव आजवर कधीही आला नाही. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत, हे वक्तव्य विचार करायला लावणारे असून, अनेक बाबींना जर मंत्री जबाबदार असतील तर सचिवांना दोष देण्यात काय अर्थ, असेही त्यांनी सांगितले. ‘मध्यावधी निवडणुकी’चे आश्चर्य वाटायला नको ! : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. जनता सध्या परिवर्तनाच्या भूमिकेत असून निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस-राष्ट्रवादीच योग्य पर्याय देऊ शकतो. मात्र, काँग्रेसबरोबर याबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, त्यांच्याकडून असा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देऊ, असेही पवार म्हणाले.