शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

देश कोणाची खासगी मालमत्ता नव्हे - पवारांनी आमिर विरोधकांना सुनावले

By admin | Updated: November 25, 2015 11:42 IST

आमिरला भारत सोडून जाण्यास सांगणा-यांना देश म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता वाटली का असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमिर विरोधकांवर निशाणा साधला.

ऑनलाइन लोकमत
कराड, दि. २५ - आमिरला भारत सोडून जाण्यास सांगणा-यांना देश म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता वाटली का असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमिर विरोधकांवर निशाणा साधला. आमिरला केला जाणारा विरोध आणि त्याला देश सोडून जायला सांगणं हीच खरी असहिष्णूता असल्याचेही पवार म्हणाले.  यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये ते बोलत होते.
देशातील असहिष्णूतेच्या वाढत्या घटनांमुळे आपण चिंतित झालो असून, पत्नी किरणने देश सोडून जाण्याबद्दल सुचवले होते, असे विधान आमिरने सोमवारी केल होते. त्याच्या या वक्तव्यानंतर काल सर्व स्तरातूंन त्याच्यावर टीकेची झोड उठत असून त्याला देशातून बाहेर जाण्याचे सल्ले देण्यात आले होते. सोशल मीडियावरही आमिरविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. शिवसेनेसारख्या पक्षाने तर आमिरला सापाची उमपा देत देश सोडायचा असेल तर पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र या विषयावर काल कोणतीही प्रतिक्रिया न देणा-या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज आपले मत मांडले.
आमीरच्या वक्तव्यानंतर त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, टीका केली जात आहे. त्यावरून त्याच्याच (असहिष्णूतेच्या) वक्तव्याला बळकटी मिळत आहे. या देशाने तुला एवढ पैसे दिले, असे अनेक लोक म्हणत आहेत, पण आमिरला कोणीही देणगी दिलेली नाही, त्याने केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्याला एवढे पैसे मिळाले आहेत, असे पवारांनी सुनावले. अनेक लोक आमिरला देश सोडून जायला सांगत आहेत, पण असं सांगायला देश काही कोणाची खासगी मालमत्ता नाही, असेही पवार म्हणाले.