ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला अवघ्या काही मिनिटात सुरूवात होणार आहे.
मुंबईसह देशातील प्रमूख शहरांमध्ये मतमोजणी केंद्रावर निवडणूक अधिकारी हजर झाले असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून देशभरातील मतमोजणीसाठी जवळपास ९८९ मतमोजणी केंद्र उभारण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून दुपारी २ पर्यंत देशात आगामी सरकार कोणत्या पक्षाचे असेल याचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.