शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

कापूस, सोयाबीन दरात घसरण!

By admin | Updated: January 29, 2015 23:25 IST

राज्यातील शेतक-यांना दरवाढीची प्रतीक्षा.

अकोला : अल्प पावसामुळे यंदा कापूस उत्पादकांच्या पदरी निराशा आली असून, कापसाचा एकरी उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी वाढ झाली नसून, खासगी बाजारातील कापसाचे दर शेतकर्‍यांना परवडणारे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या दरातही या महिन्यात प्रति क्विंटल शंभर ते सव्वाशे रुपये घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे; पण चांगले भाव मिळतील, या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आस लावून बसला आहे.गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले, यावर्षी पाऊसच नसल्याने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्च तरी निघेल, या आशेवर शेतकरी असताना, जानेवारी महिन्यात खासगी बाजारात ३३00 रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर १00 ते १२५ रुपयांनी घसरले. हमी दर २६५0 ते २८00 रुपये प्रतिक्विंटलच्यावर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाचे हमी दर ४0५0 रूपये प्रतिक्विंटल आहेत, पण प्रतवारीचे निकष लावून शेतकर्‍यांना ३९00 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. याच दराने भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) राज्यात ५५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. महाराष्ट्र सोडला, तर इतर राज्य मिळून सीसीआयने देशात तीन क्विंटल कापूस खरेदी केला आहे.सोयाबीन आणि कापसाचे भाव खासगी बाजारात कमी झाले असून, कापसाचे भाव वाढतील, अशी सध्यातरी कोणतीच शक्यता दिसत नाही. जगाच्या तुलनेत भारतातील हे दर बरेच म्हणावे लागतील, असा निष्कर्ष अकोला येथील कापूस व्यावसायिक बसंत बाछुका यांनी काढला.