शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

कापूस, सोयाबीन दरात घसरण!

By admin | Updated: January 29, 2015 23:25 IST

राज्यातील शेतक-यांना दरवाढीची प्रतीक्षा.

अकोला : अल्प पावसामुळे यंदा कापूस उत्पादकांच्या पदरी निराशा आली असून, कापसाचा एकरी उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी वाढ झाली नसून, खासगी बाजारातील कापसाचे दर शेतकर्‍यांना परवडणारे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या दरातही या महिन्यात प्रति क्विंटल शंभर ते सव्वाशे रुपये घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे; पण चांगले भाव मिळतील, या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आस लावून बसला आहे.गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले, यावर्षी पाऊसच नसल्याने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्च तरी निघेल, या आशेवर शेतकरी असताना, जानेवारी महिन्यात खासगी बाजारात ३३00 रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर १00 ते १२५ रुपयांनी घसरले. हमी दर २६५0 ते २८00 रुपये प्रतिक्विंटलच्यावर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाचे हमी दर ४0५0 रूपये प्रतिक्विंटल आहेत, पण प्रतवारीचे निकष लावून शेतकर्‍यांना ३९00 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. याच दराने भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) राज्यात ५५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. महाराष्ट्र सोडला, तर इतर राज्य मिळून सीसीआयने देशात तीन क्विंटल कापूस खरेदी केला आहे.सोयाबीन आणि कापसाचे भाव खासगी बाजारात कमी झाले असून, कापसाचे भाव वाढतील, अशी सध्यातरी कोणतीच शक्यता दिसत नाही. जगाच्या तुलनेत भारतातील हे दर बरेच म्हणावे लागतील, असा निष्कर्ष अकोला येथील कापूस व्यावसायिक बसंत बाछुका यांनी काढला.