शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

कापूस, सोयाबीन दरात घसरण!

By admin | Updated: January 29, 2015 23:25 IST

राज्यातील शेतक-यांना दरवाढीची प्रतीक्षा.

अकोला : अल्प पावसामुळे यंदा कापूस उत्पादकांच्या पदरी निराशा आली असून, कापसाचा एकरी उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी वाढ झाली नसून, खासगी बाजारातील कापसाचे दर शेतकर्‍यांना परवडणारे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या दरातही या महिन्यात प्रति क्विंटल शंभर ते सव्वाशे रुपये घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे; पण चांगले भाव मिळतील, या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आस लावून बसला आहे.गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले, यावर्षी पाऊसच नसल्याने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्च तरी निघेल, या आशेवर शेतकरी असताना, जानेवारी महिन्यात खासगी बाजारात ३३00 रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर १00 ते १२५ रुपयांनी घसरले. हमी दर २६५0 ते २८00 रुपये प्रतिक्विंटलच्यावर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाचे हमी दर ४0५0 रूपये प्रतिक्विंटल आहेत, पण प्रतवारीचे निकष लावून शेतकर्‍यांना ३९00 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. याच दराने भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) राज्यात ५५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. महाराष्ट्र सोडला, तर इतर राज्य मिळून सीसीआयने देशात तीन क्विंटल कापूस खरेदी केला आहे.सोयाबीन आणि कापसाचे भाव खासगी बाजारात कमी झाले असून, कापसाचे भाव वाढतील, अशी सध्यातरी कोणतीच शक्यता दिसत नाही. जगाच्या तुलनेत भारतातील हे दर बरेच म्हणावे लागतील, असा निष्कर्ष अकोला येथील कापूस व्यावसायिक बसंत बाछुका यांनी काढला.