शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

राज्यात कापसाचे उत्पादन घटणार!

By admin | Updated: September 24, 2015 23:45 IST

विदर्भ, मराठवाड्याला बसणार सर्वाधिक फटका.

राजरत्न सिरसाट/अकोला: यावर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण याचा कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, राज्यातील कापसाचे उत्पादन यावर्षी ५0 टक्के घटण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. राज्यात जवळपास ३५ लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यातील १७ लाख विदर्भ, १५ लाख हेक्टर मराठवाडा उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती. तथापि, शेतकर्‍यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने झाडाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात कापसाला फुले, पात्या परिपक्व होण्याची अवस्था असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कापसाची बोंडं परिपक्व होऊन कापूस वेचणीला येतो. दसरा, दिवाळी सणाला कापूस वेचणीचा शुभारंभ करतात; परंतु पावसाचा ताण पडलेल्या कापसाची कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटली असून, दोन इंच वाढलेल्या कापसाच्या झाडाला आताच फुलोरा येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हेच झाड अपरिपक्वतेचे प्रमाण असल्याने त्याचा कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. विदर्भाचा विचार केल्यास यंदा सर्वाधिक कापसाचे १५ लाख हेक्टर क्षेत्र पश्‍चिम विदर्भात आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती व यवतमाळचा पांढरकवडा व वर्धा जिलचा भाग सोडला तर उर्वरित अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ात सरासरी ४0 टक्के पाऊस अद्याप कमी आहे. विदर्भातील पावसाची स्थिती बघता कापसाचे उत्पादन ४0 ते ५0 टक्क्याच्या जवळपास होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस आला तरी उत्पादनात फारशी वाढ होईल, असे वाटत नाही. कारण कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटलेल्या झाडांना अपेक्षित पात्या, फुले धरलेच नसल्याचे डॉ. पंदेकृविचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी सांगीतले.

*पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम

    मराठवाडा, खान्देश व विदर्भात कापूस हे नगदी पीक घेतले जाते. तथापि, यावर्षी पेरणीनंतर पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन घटणार हे निश्‍चित मानले जात आहे.