शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

राज्यात कापसाचे उत्पादन घटणार!

By admin | Updated: September 24, 2015 23:45 IST

विदर्भ, मराठवाड्याला बसणार सर्वाधिक फटका.

राजरत्न सिरसाट/अकोला: यावर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण याचा कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, राज्यातील कापसाचे उत्पादन यावर्षी ५0 टक्के घटण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. राज्यात जवळपास ३५ लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यातील १७ लाख विदर्भ, १५ लाख हेक्टर मराठवाडा उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती. तथापि, शेतकर्‍यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने झाडाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात कापसाला फुले, पात्या परिपक्व होण्याची अवस्था असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कापसाची बोंडं परिपक्व होऊन कापूस वेचणीला येतो. दसरा, दिवाळी सणाला कापूस वेचणीचा शुभारंभ करतात; परंतु पावसाचा ताण पडलेल्या कापसाची कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटली असून, दोन इंच वाढलेल्या कापसाच्या झाडाला आताच फुलोरा येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हेच झाड अपरिपक्वतेचे प्रमाण असल्याने त्याचा कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. विदर्भाचा विचार केल्यास यंदा सर्वाधिक कापसाचे १५ लाख हेक्टर क्षेत्र पश्‍चिम विदर्भात आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती व यवतमाळचा पांढरकवडा व वर्धा जिलचा भाग सोडला तर उर्वरित अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ात सरासरी ४0 टक्के पाऊस अद्याप कमी आहे. विदर्भातील पावसाची स्थिती बघता कापसाचे उत्पादन ४0 ते ५0 टक्क्याच्या जवळपास होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस आला तरी उत्पादनात फारशी वाढ होईल, असे वाटत नाही. कारण कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटलेल्या झाडांना अपेक्षित पात्या, फुले धरलेच नसल्याचे डॉ. पंदेकृविचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी सांगीतले.

*पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम

    मराठवाडा, खान्देश व विदर्भात कापूस हे नगदी पीक घेतले जाते. तथापि, यावर्षी पेरणीनंतर पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन घटणार हे निश्‍चित मानले जात आहे.