शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कापसाचे उत्पादन घटणार!

By admin | Updated: September 24, 2015 23:45 IST

विदर्भ, मराठवाड्याला बसणार सर्वाधिक फटका.

राजरत्न सिरसाट/अकोला: यावर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण याचा कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, राज्यातील कापसाचे उत्पादन यावर्षी ५0 टक्के घटण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. राज्यात जवळपास ३५ लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यातील १७ लाख विदर्भ, १५ लाख हेक्टर मराठवाडा उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती. तथापि, शेतकर्‍यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने झाडाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात कापसाला फुले, पात्या परिपक्व होण्याची अवस्था असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कापसाची बोंडं परिपक्व होऊन कापूस वेचणीला येतो. दसरा, दिवाळी सणाला कापूस वेचणीचा शुभारंभ करतात; परंतु पावसाचा ताण पडलेल्या कापसाची कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटली असून, दोन इंच वाढलेल्या कापसाच्या झाडाला आताच फुलोरा येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हेच झाड अपरिपक्वतेचे प्रमाण असल्याने त्याचा कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. विदर्भाचा विचार केल्यास यंदा सर्वाधिक कापसाचे १५ लाख हेक्टर क्षेत्र पश्‍चिम विदर्भात आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती व यवतमाळचा पांढरकवडा व वर्धा जिलचा भाग सोडला तर उर्वरित अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ात सरासरी ४0 टक्के पाऊस अद्याप कमी आहे. विदर्भातील पावसाची स्थिती बघता कापसाचे उत्पादन ४0 ते ५0 टक्क्याच्या जवळपास होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस आला तरी उत्पादनात फारशी वाढ होईल, असे वाटत नाही. कारण कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटलेल्या झाडांना अपेक्षित पात्या, फुले धरलेच नसल्याचे डॉ. पंदेकृविचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी सांगीतले.

*पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम

    मराठवाडा, खान्देश व विदर्भात कापूस हे नगदी पीक घेतले जाते. तथापि, यावर्षी पेरणीनंतर पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन घटणार हे निश्‍चित मानले जात आहे.