शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कापसाचे उत्पादन घटले !

By admin | Updated: November 9, 2014 23:47 IST

पश्‍चिम विदर्भात हेक्टरी चार ते पाच क्विंटलचाच उतारा

अकोला : उशिराने आलेला मान्सून आणि पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने िपकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात कापसाचे उत्पादन ३0 ते ४0 टक्के कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात हेक्टरी केवळ चार ते पाच िक्ंवटलचाच उतारा असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात कापसाचे जवळपास ४0 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी विदर्भात १७ लाख, मराठवाड्यात १५ लाख, आणि उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी २३ जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती; तथापि शेतकर्‍यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने का पसाच्या झाडांची वाढ खुंटली. या अपरिपक्व कापसाच्या झाडाला फुलोरा येण्यास सुरू वात झाली होती. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला.गतवर्षी कापसाला अतवृष्टीचा फटका बसेल, असे वाटले होते; मात्र जवळपास ३७0 लाख गाठींचे उत्पादन झाले. ११0 लाख गाठींची निर्यातही झाली होती. विदर्भाचा विचार केल्यास यंदा कापसाचे सर्वाधिक १0 लाख हेक्टर क्षेत्र पश्‍चिम विदर्भात आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती जिल्हा सोडला तर अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ांत सरासरी ४0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्याचा परिणाम कापूस पिकावर झाला आहे.उशिरा पेरणी झाल्यामुळे नैसर्गिकरित्याच कमी उत्पादनाची शक्यता असते. यावर्षी उशिरा पेरणी झाली. शिवाय ऐन पीक वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला. परतीच्या पावसानेही धोका दिला. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनात घट अ पेक्षितच असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस संशोधक डॉ. टी. एच. राठोड यांनी स्पष्ट केले.