शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे उत्पादन घटले !

By admin | Updated: November 9, 2014 23:47 IST

पश्‍चिम विदर्भात हेक्टरी चार ते पाच क्विंटलचाच उतारा

अकोला : उशिराने आलेला मान्सून आणि पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने िपकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात कापसाचे उत्पादन ३0 ते ४0 टक्के कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात हेक्टरी केवळ चार ते पाच िक्ंवटलचाच उतारा असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात कापसाचे जवळपास ४0 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी विदर्भात १७ लाख, मराठवाड्यात १५ लाख, आणि उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी २३ जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती; तथापि शेतकर्‍यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने का पसाच्या झाडांची वाढ खुंटली. या अपरिपक्व कापसाच्या झाडाला फुलोरा येण्यास सुरू वात झाली होती. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला.गतवर्षी कापसाला अतवृष्टीचा फटका बसेल, असे वाटले होते; मात्र जवळपास ३७0 लाख गाठींचे उत्पादन झाले. ११0 लाख गाठींची निर्यातही झाली होती. विदर्भाचा विचार केल्यास यंदा कापसाचे सर्वाधिक १0 लाख हेक्टर क्षेत्र पश्‍चिम विदर्भात आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती जिल्हा सोडला तर अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ांत सरासरी ४0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्याचा परिणाम कापूस पिकावर झाला आहे.उशिरा पेरणी झाल्यामुळे नैसर्गिकरित्याच कमी उत्पादनाची शक्यता असते. यावर्षी उशिरा पेरणी झाली. शिवाय ऐन पीक वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला. परतीच्या पावसानेही धोका दिला. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनात घट अ पेक्षितच असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस संशोधक डॉ. टी. एच. राठोड यांनी स्पष्ट केले.