शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

खासगी बाजारात कापसाचे दर शंभर रुपयांनी वाढले!

By admin | Updated: November 20, 2015 02:06 IST

पणन महासंघाकडे आला नऊ हजार क्विंटल कापूस.

अकोला : मागील आठवड्यात खासगी बाजारपेठेत घसरलेल्या कापसाच्या दरात अल्पशी सुधारणा झाली असून, गुरुवारी हमीदरापेक्षा प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. खासगी बाजारात आजमितीस शेतकर्‍यांनी १४ लाख ९१ हजार ३३५ क्विंटल कापूस विकला आहे. त्यातुलनेत पणन महासंघाने अवघ्या ८ हजार ८४१ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यावर्षी कापसाला ४१00 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव केंद्र शासनाने जाहीर केले; तथापि कापूस खरेदी करताना प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने प्रत्यक्षात शेतकर्‍यांना ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल भाव दिले जात आहेत आणि खासगी बाजारातही कापसाच्या दरात आतापर्यंत चढउतार होता; पण विक्रीची रक्कम तातडीने मिळत असल्याने शेतकर्‍यांची पसंत खासगी बाजारालाच आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांनी जवळपास १४ लाख ९१ हजार ३३५ क्विंटल कापूस व्यापार्‍यांना दिला आहे. दरम्यान, पाच दिवसांच्या सुटीनंतर सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने जवळपास ८ हजार ८४१ क्विंटल कापसाची खरेदी केली; परंतु पणनच्या कापूस खरेदी केंद्राकडे कापसाची हवी तेवढी आवक नसल्याचे एकूण चित्र आहे. राज्यातील पणनच्या खरेदीची आकडेवारी बघितल्यास सर्वाधिक कापूस हा यवतमाळ खरेदी केंद्रावर ४,९४६ क्विंटल खरेदी करण्यात आला. नागपूर ९७४ क्विंटल, वणी ९७, अकोला ८१0, अमरावती ३0.0५, खामगाव ३६ क्विंटल २५ किलो, औरंगाबाद ४0.९५, परभणी ५४७, परळी १५.९५, जळगाव खान्देश १,३४२ क्विंटल तर नांदेडला अद्याप खरेदीच झाली नाही.