शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघर पाणी योजनांमध्ये भ्रष्टाचार

By admin | Updated: February 25, 2016 02:46 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे

मुंबई : ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे अशा गंभीर बाबी समोर आल्या असून या प्रकरणी संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील आणि रकमेची संबंधितांकडून वसुलीही केली जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. या दोन जिल्ह्यांत गेल्या १० वर्षांत हाती घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी लोणीकर यांनी संबंधित यंत्रणेला कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आ. किसन काथोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता हेमंत लांडगे, तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणी पुरवठा योजनेच्या कामाची तपासणी विभागीय आयुक्त आणि गुणवत्ता पथक यांच्या मार्फत करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ६२२ व पालघर जिल्ह्यातील ९४२ अशा एकूण १५६४ नळ पाणी पुरवठा व साधी विहिर योजनेच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी ठाणे जिल्ह्यातील ६२२ योजनांपैकी ४७८ योजनांची तसेच पालघर जिल्ह्यातील ९४२ योजनापैकी ६३८ योजनांची तपासणी केली असून ज्या योजनांची तपासणी अजूनपर्यंत झाली नाही त्या पाणी पुरवठा योजनांची तपासणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)वेतनवाढ रोखणार... जनतेला पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाची असून जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये कामात निष्काळजीपणा केल्याचा शेरा देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना मिळणारी वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांना बढतीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारची कार्यवाही केल्याशिवाय अधिकारी वर्ग जनतेची कामे आत्मीयतेने करणार नाहीत असेही लोणीकर यांनी बजावले.