शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

ठाणे, पालघर पाणी योजनांमध्ये भ्रष्टाचार

By admin | Updated: February 25, 2016 02:46 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे

मुंबई : ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे अशा गंभीर बाबी समोर आल्या असून या प्रकरणी संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील आणि रकमेची संबंधितांकडून वसुलीही केली जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. या दोन जिल्ह्यांत गेल्या १० वर्षांत हाती घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी लोणीकर यांनी संबंधित यंत्रणेला कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आ. किसन काथोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता हेमंत लांडगे, तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणी पुरवठा योजनेच्या कामाची तपासणी विभागीय आयुक्त आणि गुणवत्ता पथक यांच्या मार्फत करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ६२२ व पालघर जिल्ह्यातील ९४२ अशा एकूण १५६४ नळ पाणी पुरवठा व साधी विहिर योजनेच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी ठाणे जिल्ह्यातील ६२२ योजनांपैकी ४७८ योजनांची तसेच पालघर जिल्ह्यातील ९४२ योजनापैकी ६३८ योजनांची तपासणी केली असून ज्या योजनांची तपासणी अजूनपर्यंत झाली नाही त्या पाणी पुरवठा योजनांची तपासणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)वेतनवाढ रोखणार... जनतेला पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाची असून जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये कामात निष्काळजीपणा केल्याचा शेरा देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना मिळणारी वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांना बढतीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारची कार्यवाही केल्याशिवाय अधिकारी वर्ग जनतेची कामे आत्मीयतेने करणार नाहीत असेही लोणीकर यांनी बजावले.