शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

‘आसाम रायफल’शी शरणागतीसाठी पत्रव्यवहार

By admin | Updated: April 4, 2017 06:00 IST

सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्य दलातील कर्मचारी धाकलू पाटील याच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्य दलातील कर्मचारी धाकलू पाटील याच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या या आरोपीने शरणागती पत्करावी, यासाठी ठाणे पोलिसांनी आसाम रायफल रेजिमेंटशी पत्रव्यवहार केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश केला होता. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून तिघांनाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. तपासादरम्यान आसाम रायफल रेजिमेंटमध्ये तैनात असलेला धाकलू पाटील हाही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील त्याची भूमिकाही महत्त्वाची असल्याने त्याला ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू करताच धाकलू याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. गतआठवड्यात न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी आरोपीच्या अटकेसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत.दरम्यान, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ फेब्रुवारी रोजी पुणे, नागपूर आणि गोव्यात एकाच वेळी धाडी टाकल्या, त्या वेळी आरोपींसोबत ३५० विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा हे विद्यार्थी आरोपींनी फोडलेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव करीत होते. बहुतांश विद्यार्थी आजी किंवा माजी सैनिकांच्या कुटुंबांतील असून त्यापैकी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. पेपर फोडण्यासाठी आरोपींशी त्यांनी कोणताही आर्थिक व्यवहार केला नव्हता, हे तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर उभे करण्याचा विचार तपास यंत्रणा करीत आहे. त्यासाठी पुराव्याचा भाग म्हणून २७० विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. (प्रतिनिधी)