शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

नगरसेवकांना चिंता राजकीय हस्तक्षेपाची

By admin | Updated: June 11, 2016 00:54 IST

महापालिकेची निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग यानुसार घेण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष प्रणीत राज्य सरकारने घेतला.

पुणे : राजकीय पक्षांचा विरोध डावलून महापालिकेची निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग यानुसार घेण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष प्रणीत राज्य सरकारने घेतला. त्यानंतर आता भाजपा वगळता अन्य राजकीय पक्षांच्या नगरसेवकांना प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होण्याच्या चिंतेने ग्रासले आहे. एका खासगी संस्थेच्या सहकार्याने प्रारूप रचना तयार झाली असून तीच सरकारी रचना म्हणून नक्की केली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.प्रामुख्याने गेली सलग १० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होणार याची खात्रीच वाटते आहे. त्यासाठी चार सदस्यांचा प्रभाग करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा दाखला देण्यात येतो. एका खासगी संस्थेकडून सर्वेक्षण करून घेतल्यानंतर जास्त संख्येच्या मतदारांचा प्रभाग केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वलयाचा फायदा मिळेल, असा निष्कर्ष निघाला. वास्तविक बहुसदस्यीय प्रभागाला सरकारचाच घटक असलेल्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचा विरोध होता, मात्र तो डावलून सरकारने निर्णय घेतलाच. त्यामुळेच आता प्रभाग रचनाही भाजपाला सोयीची असेल तशीच करून घेण्यात येईल, असे बोलले जात आहे.ही रचना आॅगस्टच्या मध्यावर जाहीर करायची, नियमानुसार हरकती मागवायच्या व त्यांची सुनावणी घेऊन नंतर लगेच अंतिम रचना जाहीर करायची व त्यावर आरक्षण सोडत काढायची. यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना कमी वेळ मिळेल व त्याचाही फायदा भाजपाला होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सांगतात. बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर तसेच रामदास आठवले यांच्या रिपाइंने जाहीर केले होते, मात्र अद्याप त्यांनी तसे काही केले नसल्याने बहुसदस्यीय प्रभाग रचना त्यांनी स्वीकारली असल्याचेच दिसते आहे. (प्रतिनिधी)>शहराचा मध्यभाग वगळता शहराचा मध्यभाग वगळता उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त असून, तिथे त्यांचे राजकीय वर्चस्वही आहे. प्रभाग रचनेत ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आरोप आहे. असे वर्चस्व असलेल्या प्रभागांची मोडतोड करून त्यातून चार सदस्यांचा एक प्रभाग तयार केला जाईल. भाजपाशी संबंधित एका खासगी संस्थेने अशी प्रभाग रचना तयार केली आहे. सरकारी रचना म्हणून थोडा फेरफार करून हीच रचना प्रारूप रचना म्हणून जाहीर करायची असा राजकीय डाव भाजपाने रचला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे आहे.>प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक आयोगाचे अद्याप कसलेही आदेश नाहीत. निवडणुकीशी संबंधित कोणतेही काम आयोगाच्या निर्देशानुसार होत असते. सरकारचा त्यात काहीही संबंध नसतो.- सतीश कुलकर्णी- उपायुक्त तथा निवडणूक अधिकारी, महापालिका