शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

ठेकेदाराने थकवली परिवहनची रॉयल्टी

By admin | Updated: December 8, 2014 02:50 IST

ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका ठेकेदारावर केवळ नोटीसची कार्यवाही करीत आहे.

राजू काळे, भार्इंदरपालिकेने तीन वर्षांपूर्वी खासगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेल्या स्थानिक परिवहन सेवेची ठेकेदाराकडून पालिकेला मिळणारी ७१ लाख ८९ हजार ५८५ रु. लाखांची रॉयल्टी थकीत असल्याचे उजेडात आले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका ठेकेदारावर केवळ नोटीसची कार्यवाही करीत आहे. ठेकेदाराने मात्र पालिकेकडून आवश्यक सुविधाच मिळत नसल्याने तोटा होत आहे, त्यामुळे रॉयल्टी थकल्याचा दावा केला आहे. पालिकेने ९ आॅक्टोबर २०१० रोजी प्रति किलोमीटर १ रुपयाप्रमाणे रॉयल्टी देणारी पीपीपी तत्त्वावरील स्थानिक परिवहन सेवा सुरू केली. त्याचा ठेका उल्हासनगरच्या मे. केस्ट्रल इन्फ्रा. प्रा.लि. या कंपनीला देण्यात आला. बसखरेदीसाठी प्रशासनाने केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम (जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान) योजनेचा आधार घेतला आहे. एकूण १०२ बसची सेवा सुरू करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या बस राज्यातीलच एका स्थानिक प्रशासनाकडून नाकारण्यात आल्या होत्या असे गोपनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बस कंपनीकडून गॅरंटीच्या काळात बसची दुरुस्ती होणे अपेक्षित असताना एकदाही ती करण्यातआली नाही. तसा पाठपुरावा ठेकेदार व प्रशासनाकडूनच करण्यात आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या काळातच बस बिघडू लागल्या. सध्याच्या ५२ बसमधील सुमारे २० बस बिघडल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेकरिता ३२ बस रस्त्यावर धावत असून त्यात उल्हासनगर येथील ४ ते ६ बसचा आधार घेण्यात आला आहे. पालिकेकडून सुविधा मिळत नसल्यामुळेच शासकीय करासह प्रवासी कराचा भरणा व पालिकेला देय असलेली रॉयल्टी थकल्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. आॅक्टोबर २०११ ते सप्टेंबर २०१४ पर्यंत सुमारे ७८ लाख ८९ हजार ५८५ रु.पर्यंत रॉयल्टीची रक्कम थकीत आहे. त्यातील सुमारे सात लाख रु. आॅक्टोबर महिन्यात ठेकेदाराकडून भरण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित ७१ लाख ८९ हजार ५८५ रु. रॉयल्टी अद्याप थकीत असली तरी ती वसूल करण्यासाठी प्रशासन ठेकेदाराला केवळ नोटीस बजावून ठेकेदाराला रॉयल्टी भरण्याची आठवण करून देत आहे.