शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
2
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
3
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
4
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
5
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
6
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
7
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
8
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
9
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
10
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
11
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
12
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
13
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
14
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
15
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
16
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
17
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
18
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
19
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
20
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

उष्णतेची लाट कायम, दोन बळी

By admin | Updated: May 22, 2016 03:50 IST

विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेची लाट कायम असून शनिवारी उपराजधानी नागपुरात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला.

पुणे/मुंबई/नागपूर : विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेची लाट कायम असून शनिवारी उपराजधानी नागपुरात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला. तर खान्देशात २५० वटवाघुळांचा जीव गेला. मुंबईत ढगाळ वातावरण असले तरी जिवाची उलाघाल कायम आहे.राज्यात गेल्या चार दिवसांपासून आलेली अतिउष्णतेची लाट शनिवारीही कायम होती. मराठवाड्यासह कोकण आणि गोवाही तापला असून या तीनही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भात दुपारची अघोषित संचारबंदी कायम असून जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. अकोला जिल्ह्यात शनिवारी दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यामुळे गत चार दिवसांत जिल्ह्यातील मृतांचा आकडा आठ झाला आहे. हिवरखेड (ता. तेल्हारा) येथील शेतमजूर महिला अंजनाबाई महादेवराव बोंबटकार आणि उज्ज्वला महादेव चिकटे (४०) या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला. खान्देशातही सूर्य आग ओकत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत तापमान किंचित कमी झाले आहे. पाटालगत निंबाच्या झाडावर वटवाघुळे मृत्युमुखी पडल्याचे तर काही मरणासन्न अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. येत्या २४ तासांत कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : अमरावती ४५.६, वर्धा ४५.५, चंद्रपूर ४५, यवतमाळ व ब्रह्मपुरी ४४.५, नांदेड ४४, अकोला ४३.८, मालेगाव ४३.६, बीड ४३.२, गोंदिया ४२.६, औरंगाबाद ४१, अहमदनगर ४०.८, वाशिम व बुलडाणा ४०.६, सोलापूर ४०.१, नाशिक ३६.८, पुणे ३५.९, डहाणू ३५.७, सातारा ३५.६, मुंबई ३५.४ आणि रत्नागिरी ३४.४.