शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

स्थगितीपूर्वी दिलेले आरक्षण कायम ठेवावे

By admin | Updated: June 9, 2016 06:03 IST

मराठा आरक्षणसंदर्भात काढण्यात आलेल्या वटहुकूमाला उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली.

मुंबई : मराठा आरक्षणसंदर्भात काढण्यात आलेल्या वटहुकूमाला उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. मात्र या स्थगितीपूर्वी ज्यांना या वटहुकूमांतर्गत करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी कार्यालयांतील नियुक्त्या कायम ठेवण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारच्या या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काढलेल्या वटहुकूमाला स्थगिती दिली. मात्र स्थगितीपूर्वी राज्य सरकारने वटहुकूमानुसार लगबगीने सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्त्या केल्या व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशही दिले होते. उच्च न्यायालयाने वटहुकूमाला स्थगिती दिल्याने लाभार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या वटहुकूमाला स्थगिती देण्यापूर्वी दिलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात सिव्हील अर्ज केला आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलेले आरक्षण काढू नये, अशीही विनंती सरकारने न्यायालयाला केली आहे. (प्रतिनिधी) ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावेसरकारी कार्यालयांत आणि शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने २५ जून २०१४ रोजी घेतला. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्य सरकार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असतानाही राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.