शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्थगितीपूर्वी दिलेले आरक्षण कायम ठेवावे

By admin | Updated: June 9, 2016 06:03 IST

मराठा आरक्षणसंदर्भात काढण्यात आलेल्या वटहुकूमाला उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली.

मुंबई : मराठा आरक्षणसंदर्भात काढण्यात आलेल्या वटहुकूमाला उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. मात्र या स्थगितीपूर्वी ज्यांना या वटहुकूमांतर्गत करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी कार्यालयांतील नियुक्त्या कायम ठेवण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारच्या या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काढलेल्या वटहुकूमाला स्थगिती दिली. मात्र स्थगितीपूर्वी राज्य सरकारने वटहुकूमानुसार लगबगीने सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्त्या केल्या व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशही दिले होते. उच्च न्यायालयाने वटहुकूमाला स्थगिती दिल्याने लाभार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या वटहुकूमाला स्थगिती देण्यापूर्वी दिलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात सिव्हील अर्ज केला आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलेले आरक्षण काढू नये, अशीही विनंती सरकारने न्यायालयाला केली आहे. (प्रतिनिधी) ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावेसरकारी कार्यालयांत आणि शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने २५ जून २०१४ रोजी घेतला. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्य सरकार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असतानाही राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.