शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चंदू चव्हाणांच्या सुटकेसाठी भारत साधणार पाक परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 08:52 IST

पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय लष्करातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याची माहिती मिळते आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 - पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय लष्करातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याची माहिती मिळते आहे. भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले त्यावेळी चंदू चव्हाण यांनी अनावधानाने सीमा ओलांडल्याने ते पाकिस्तानात पोहोचले होते.
 
चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. याआधी केवळ भारतीय लष्कराचे महासंचालक रणबीर सिंह यांनी चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी लष्कराकडे मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कारातील महासंचालकांकडून याबाबत कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे, केंद्र सरकारने आता हा मुद्दा पाकिस्तानातील  परराष्ट्र मंत्रालयसमोर मांडण्याचे ठरवले आहे. 
आणखी बातम्या
चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी प्रयत्न
चंदू चव्हाण इस्लामाबादमध्येच - पाक DGMO
 चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी डीजीएमओ स्तरावरची प्रक्रिया - संरक्षणमंत्री
 
याआधी, चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी लष्करी कारवायांचे महासंचालकांच्या (डीजीएमओ) पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली होती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक व धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याचा काही संबंध नाही. चुकून नियंत्रणरेषा ओलांडून पलिकडील देशाच्या हद्दीत गेलेल्या जवानांना परत पाठवण्यासाठी स्टॅण्डर्ड मेकॅनिझम ही कार्यपद्धती पूर्वीपासूनच आहे. चंदू चव्हाण यांनीही चुकून नियंत्रणरेषा ओलांडली आहे. त्यांना परत आणण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जात आहे,असे पर्रीकर यांनी सांगितले होते.
 
भारतीय लष्करातील चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण यांनी सर्जिकल स्ट्राईकवेळी अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून ते पाकिस्तानमध्ये गेले होते. दरम्यान, चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.