शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राज्यघटनाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ

By admin | Updated: April 5, 2015 00:48 IST

जिथे मानवी हक्कांचा विचार होतो, तिथे भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ ठरते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

जब्बार पटेल : डीएसके गप्पांमध्ये मांडली दिलखुलास मतेपुणे : देशातील सर्व धर्मग्रंथांपेक्षा राज्यघटना हाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. यामध्ये सर्व धर्मांतील नागरिकांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जिथे मानवी हक्कांचा विचार होतो, तिथे भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ ठरते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘डीएसके गप्पा’ कार्यक्रमात त्यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. ‘मी उभा आहे’ या पहिल्या नाटकापासून ते अशी पाखरे येती, सामना, सिंहासन या अजरामर कलाकृतींच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांच्यावरील चित्रपटांबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. राजेश दामले व राज काझी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पटेल म्हणाले, की चरित्रपट निर्माण करताना एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती देणे एक आव्हान असते. डॉ. आंबेडकर हे तर विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशाला दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना सर्व घटकांतील नागरिकांना न्याय देणारी आहे. यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट मांडणेही सोपे नव्हते.नाट्य व चित्रपटसृष्टीतील प्रवासाविषयी भरभरून बोलताना पटेल म्हणाले, की वयाच्या बाराव्या वर्षी आचार्य अत्रे यांच्या ‘मी उभा आहे’ या नाटकातून रंगभूमीवर प्रवेश केला. त्या वेळी पहिल्याच वाक्याला मिळालेल्या टाळ््यांनी रंगभूमीवर काम करण्यास प्रेरित केले. त्यानंतर कॉलेज जीवनात नाटके सुरूच राहिली. पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी आल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांच्या सहवासामुळे नाट्य क्षेत्रात जणू मिसळून गेलो. माणूस नावाचं बेटं, घाशीराम कोतवाल, श्रीमंत, अशी पाखरे येती, खून पाहावा करून या नाटकांबरोबरच सामना, सिंहासन, जैत रे जैत, मुक्ता हे चित्रपट आयुष्यातील माईलस्टोन ठरले. विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे आणि डॉ. लागू हे आपले दैवत असल्याचे पटेल यांनी सांगितले. १९७२ मध्ये सोडलेली अभिनयाची वाट पुन्हा धरणार नसल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)४‘अशी पाखरे येती’ या नाटकाचा हिंदी चित्रपट म्हणजे ‘मुसाफिर’. रेखा आणि नसरुद्दीन शहा यांच्यावर १९८६ मध्ये चित्रित झालेला हा चित्रपट निर्मात्यांमधील वाद, तसेच रीळ खराब झाल्याने पडद्यावर येऊ शकला नव्हता. मात्र, ही खराब झालेली रीळ पुन्हा पहिल्यासारखी किंबहुना अधिक चांगली करण्यात यश आली आहे. त्यामुळे लवकर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये येईल की नाही, हे स्पष्ट नसले तरी दूरचित्रवाणीवर पे्रक्षकांना हा चित्रपट पाहता येईल, असे जब्बार पटेल यांनी सांगितले.